तर मराठा समाजाचे नुकसान होईल जरांगेंना सांगितले, देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची प्रतिक्रिया!
आंदोलने चालतच असतात. यापूर्वीही त्यांनी आंदोलन केलेले आहे. पुढेही ते आंदोलन करू शकतात. उलट यावेळी त्यांनी केलेल्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या. त्यांनी एकूण 13 मागण्या केल्या होत्या. त्यातील 12 मागण्या मान्य करण्यात आल्या. जी मागणी मान्य होऊ शकत नव्हती त्याबाबत कायद्याची अडचण काय आहे हे त्यांना समजावून सांगण्यात आलं, अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी दोन वेळा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांना परवानगी मागितली. परंतु दोन्ही वेळा पोलिसांनी त्यांना आंदोलनास नकार दिला. आता पुन्हा एकदा जरांगे यांनी आंदोलनासाठी नव्याने अर्ज केला आहे. दुसरीकडे काहीही झालं तरी मी मुंबईला जाणारच आहे. माझ्यासोबत मराठा बांधव नसतील. मी एकटाच आझाद मैदानात आंदोलन करणार आहे, असं जरांगे यांनी जाहीर केलं असून त्यांनी आता मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोर्टाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान होईल, असं महत्त्वाचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
सणाला कुठलेही विघ्न येऊ नये
कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. कोणाला आंदोलनाला परवानगी द्यायची आणि कोणाला नकार द्यायचा याबाबतचा अर्ज पोलीस घेतात. जरांगे यांचा आलेला अर्ज पोलिसांनी नाकारला आहे. जरांगे यांनी पुन्हा अर्ज केला आहे. त्यावर पोलीस विचार करतील. आमची अपेक्षा एवढीच आहे की, मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात गणेशोत्सव हा प्रचंड मोठा सण असतो. हिंदू समाजातील हा खूप मोठा सण आहे. हा सण सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. या सणाला कुठलेही विघ्न येऊ नये अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
तर मराठा समाजाचं नुकसान होईल
तसेच, आंदोलने चालतच असतात. यापूर्वीही त्यांनी आंदोलन केलेले आहे. पुढेही ते आंदोलन करू शकतात. उलट यावेळी त्यांनी केलेल्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या. त्यांनी एकूण 13 मागण्या केल्या होत्या. त्यातील 12 मागण्या मान्य करण्यात आल्या. जी मागणी मान्य होऊ शकत नव्हती त्याबाबत कायद्याची अडचण काय आहे हे त्यांना समजावून सांगण्यात आलं, अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना आपण कोर्टाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल याबाबतही जरांगे यांना समजावून सांगण्यात आलं आहे. अशा पद्धतीने भूमिका न घेता सणासुदीच्या दिवसांत लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे, असंही फडणवीस म्हणाले. त्यामुळे जरांगे माघार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.