AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरात भक्ताने दिलेला पैसा ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकारच काय?, महंत रामगिरी महाराज यांचा सवाल

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे आयोजित केले आहे. राज्यभरातील एक हजाराहून अधिक मंदिर प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

मंदिरात भक्ताने दिलेला पैसा ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकारच काय?, महंत रामगिरी महाराज यांचा सवाल
mahant ramgiri maharaj
| Updated on: Dec 24, 2024 | 4:07 PM
Share

हिंदूंच्या ज्या मंदिरात उत्पन्न दिसायला लागते ते मंदिर सरकार ताब्यात घेते. शेकडो हजारो कोटींचे व्यवहार होणारी इतर धर्मियांची मंदिरे सरकारच्या ताब्यात नाहीत. त्यामुळे हिंदू मंदिरात भक्ताने दिलेला पैसा सरकारने ताब्यात घेण्याचा अधिकारच काय? असा सवाल महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत बोलताना त्यांनी हा सवाल केला आहे.

शिर्डीत महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार आणि उद्या असे दोन दिवस ही परिषद संपन्न होणार आहे. राज्यभरातील एक हजाराहून अधिक मंदिर प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील जिवदानी देवी संस्था, ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, साई पालखी निवारा आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे, मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे, वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यावर उपाय, मंदिरे आणि तिर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी, दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर या परिषेद होणार चर्चा होणार आहे.

मंदिरांचा पैसा मंदिरांसाठी वापरला जावा

यावेळी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी या परिषदेस उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले की ज्या मंदिरात उत्पन्न दिसायला लागते ते मंदिर सरकार ताब्यात घेत असते. शेकडो हजारो कोटींचे व्यवहार होणारे इतर धर्मियांची मंदिरे सरकारच्या ताब्यात नाहीत. मंदिरात भक्ताने दान केलेला पैसा सरकारने ताब्यात घेण्याचा अधिकारच काय ? असा सवाल महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. हा पैसा केवळ देवस्थान किंवा इतर मंदिरासाठी वापरला जावा असेही मत यावेळी रामगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.