AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse: राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीचं षडयंत्र; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

Eknath Khadse: सर्वसामान्य माणूस बेरोजगार झाला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Eknath Khadse: राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीचं षडयंत्र; एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा
एकनाथ खडसेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 6:48 PM
Share

जळगाव: राज्यात सत्ता नसल्यामुळे भाजपचे (bjp) नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते आदळ आपट करत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याच्या बोंबा ते मारत आहेत. एक तर महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच भोंगे, हनुमान चालिसाचे (hanuman chalisa) मुद्दे काढून विरोधकांकडून लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे. विरोधककांकडून राज्यात वारंवार अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्या अशा बोंबा ठोकायच्या आणि राज्यपालांना भेटायचे हेच काम विरोधकांना उरलं आहे. विरोधक राज्यपालांना वारंवार भेटून एक षड्यंत्र सुरू आहे. पण राष्ट्रपती राजवट लावण्याचं हे षड्यंत्र यशस्वी होणार नाही, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.

एकनाथ खडसे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. विरोधकांनी केंद्र सरकारकडे महागाईला दिलासा कसा मिळेल यासाठी मागणी करावी. महागाईने राज्यात उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य माणूस बेरोजगार झाला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारची भूमिका गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विषयी कठोर आहे. शासनाचे काम गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठीचं आहे. अशा स्वरूपाची कृती शासनाकडून अपेक्षित असते. महाविकासआघाडी सरकार या दृष्टीने आता पाऊल उचलत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, असं खडसे यांनी सांगितलं.

2019 मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणूक का लढले?

भाजप नेते आशिष शेलार यांच्या युतीच्या दाव्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. 2017 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी युती होणार होती. त्यास शिवसेनेने विरोध केला होता असा शेलार यांनी गौप्यस्फोट केला आहे. यावर खडसे यांनी अंदर की बात सांगितली. 2014 मध्ये भाजप शिवसेना वेगळी लढली. मात्र 2019 मध्ये मात्र भाजप-शिवसेना एकत्रित लढली होती. जर 2017 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीला शिवसेनेकडून विरोध होता तर मग 2019 मध्ये भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणूक का लढले? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. मूळात अशिष शेलार सांगताहेत ते अर्धसत्य असून 2019 मध्ये झालेल्या भाजपा-शिवसेना एकत्रित निवडणुकीत अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवे होते. मात्र त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. त्याच वेळी जर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हे ठरलं असतं तर मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे युती तुटली नसती, असं खडसे म्हणाले.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....