AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करा, भुजबळांचे आदेश

परराज्यातील कामगार, तसेच शिधापत्रिका नसलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अतिरिक्त 5 टक्के धान्यसाठा उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश छगन भुजबळ यांनी दिले आहेत. (Chhagan Bhujbal orders release of additional food grains for migrant labors)

महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करा, भुजबळांचे आदेश
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 22, 2020 | 12:15 PM
Share

मुंबई : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच दिली होती. आता परराज्यातील कामगारांना अतिरिक्त धान्यसाठा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना नागरी अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. (Chhagan Bhujbal orders release of additional food grains for migrant labors)

‘कोरोना’शी लढताना जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. उपजीविकेचं साधन नसल्यामुळे त्यांना अन्न-धान्याची निकड निर्माण झाली आहे. परराज्यातील कामगार, तसेच शिधापत्रिका नसलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अतिरिक्त 5 टक्के धान्यसाठा उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

शिधापत्रिका नसलेल्या गरीब व्यक्तींना अन्न आणि निवाऱ्याची गरज आहे. काही जणांनी स्वतःची राहण्याची सोय केली आहे, तर कुठे सरकार किंवा महापालिकांकडून निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. काही जणांना शिजवलेले अन्न पुरवले जाते, मात्र निधीचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्वयंसेवी संस्था किती काळ त्यांना अन्न पुरवतील, हा प्रश्न आहे. अशावेळी त्यांना धान्य उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात असल्याचा उल्लेख परिपत्रकात केला आहे. (Chhagan Bhujbal orders release of additional food grains for migrant labors)

हेही वाचापरराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशनकार्डधारकांना अन्न पुरवले जात आहे. यातून अतिरिक्त धान्य परराज्यातील कामगारांना उपलब्ध करुन देण्यास भुजबळ यांनी सुचवलं आहे. एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांसाठी ही तरतूद करत येईल, असंही भुजबळांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमानुसार गहू दोन रुपये प्रतिकिलो, तर तांदूळ तीन रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे.

संबंधित बातमी :

केंद्राच्या सहकार्यानं महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना घरापर्यंत पोहोचवू, उद्धव ठाकरेंचा शब्द

(Chhagan Bhujbal orders release of additional food grains for migrant labors)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...