AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, पोहण्यासाठी बॅरेजच्या पाण्यात उतरले नि घात झाला

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, पोहण्यासाठी बॅरेजच्या पाण्यात उतरले नि घात झाला
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: May 14, 2023 | 9:24 PM
Share

व्यंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : उन्हाचे दिवस असल्याने बहुतेक साऱ्यांना पाण्यात मनसोक्त भिजावेसे वाटते. उष्णतेचा पारा ४२ ते ४३ अंश डिग्री सेल्सीअसपर्यंत गेलाय. उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होते. चार युवक फिरायला गेले होते. त्यांना पोहण्याचा मोह अनावर झाला. त्यामुळे ते चीचहोड येथील बॅरेजच्या पाण्यात खाली उतरले. आतमधील पाण्याचा अंदाज आला नाही. चौघेही बुडाले.

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. मोनू त्रिलोक शर्मा (26), प्रफुल विठ्ठल येलुरे (20), शुभम रुपचंद लांजेवार (24), महेश मधुकर घोंगडे (20) सर्व रा. कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी असे मृतकांची नावे आहेत.

gadchiroli 2 n

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

चार युवक चीचडोह बॅरेजवर फिरायला गेले होते. त्या युवकांना पोहण्याचा मोह झाल्याने ते बॅरेजच्या पाण्यात उतरले. अशातच चार युवक खोलगट भागात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

बचाव पथकाने काढले मृतदेह

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठले. बोट किंवा डोंगा उपलब्ध नव्हता. जिवाची पर्वा न करता त्यांनी स्वतःला रस्सीदोरखंड बांधून खोल पाण्यात उड्या मारल्या. साधारणतः एक तास शोधमोहीम केली. चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

स्थानिक युवकांनी पोलिसांना या कामी मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

कृषक हायस्कूल चामोर्शी येते शिकत होते. या चारही युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांचा घात झाला. घटनेची माहिती झाली. तोपर्यंत या युवकांचे मृतदेहच सापडले. बचाव पथक आणि पोलीस यांनी या युवकांचे मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्याचे काम सुरू आहे.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.