AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, पोहण्यासाठी बॅरेजच्या पाण्यात उतरले नि घात झाला

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, पोहण्यासाठी बॅरेजच्या पाण्यात उतरले नि घात झाला
| Updated on: May 14, 2023 | 9:24 PM
Share

व्यंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : उन्हाचे दिवस असल्याने बहुतेक साऱ्यांना पाण्यात मनसोक्त भिजावेसे वाटते. उष्णतेचा पारा ४२ ते ४३ अंश डिग्री सेल्सीअसपर्यंत गेलाय. उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होते. चार युवक फिरायला गेले होते. त्यांना पोहण्याचा मोह अनावर झाला. त्यामुळे ते चीचहोड येथील बॅरेजच्या पाण्यात खाली उतरले. आतमधील पाण्याचा अंदाज आला नाही. चौघेही बुडाले.

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. मोनू त्रिलोक शर्मा (26), प्रफुल विठ्ठल येलुरे (20), शुभम रुपचंद लांजेवार (24), महेश मधुकर घोंगडे (20) सर्व रा. कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी असे मृतकांची नावे आहेत.

gadchiroli 2 n

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

चार युवक चीचडोह बॅरेजवर फिरायला गेले होते. त्या युवकांना पोहण्याचा मोह झाल्याने ते बॅरेजच्या पाण्यात उतरले. अशातच चार युवक खोलगट भागात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

बचाव पथकाने काढले मृतदेह

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठले. बोट किंवा डोंगा उपलब्ध नव्हता. जिवाची पर्वा न करता त्यांनी स्वतःला रस्सीदोरखंड बांधून खोल पाण्यात उड्या मारल्या. साधारणतः एक तास शोधमोहीम केली. चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

स्थानिक युवकांनी पोलिसांना या कामी मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

कृषक हायस्कूल चामोर्शी येते शिकत होते. या चारही युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांचा घात झाला. घटनेची माहिती झाली. तोपर्यंत या युवकांचे मृतदेहच सापडले. बचाव पथक आणि पोलीस यांनी या युवकांचे मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्याचे काम सुरू आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.