AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Road Fund : अंबरनाथमधील रस्त्यांसाठी साडेचौदा कोटींचा निधी, टोलेजंग इमारतींना आता मिळणार अग्निसुरक्षा

शासनाचा निधी मिळत नसल्यानं या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत नव्हती. मात्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याने या दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी शासनानं निधी मंजूर केलाय.

Ambernath Road Fund : अंबरनाथमधील रस्त्यांसाठी साडेचौदा कोटींचा निधी, टोलेजंग इमारतींना आता मिळणार अग्निसुरक्षा
अंबरनाथमधील रस्त्यांसाठी साडेचौदा कोटींचा निधीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 8:31 PM
Share

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने साडेचौदा कोटी रुपयांचा निधी (Fund) मंजूर केला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr. Balaji Kinikar) यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातल्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांची कामं मार्गी लागणार आहेत. तर नगरपालिकेच्या ताफ्यात सुसज्ज फायर ब्रिगेड (Fire Brigade) देखील येणार आहे. अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील रेल्वे स्टेशन ते कल्याण बदलापूर राज्य महामार्ग आणि पूर्व भागातील न्यू बॉंबे हॉटेल ते राहुल नगर हनुमान मंदिर या दोन रस्त्यांची कामं गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले हे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच होते.

प्रकल्पबाधित रहिवाशांचं पुनर्वसन करणार

शासनाचा निधी मिळत नसल्यानं या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत नव्हती. मात्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याने या दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी शासनानं निधी मंजूर केलाय. आज अंबरनाथ नगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार किणीकर आणि अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी ही माहिती दिली. दरम्यान, अंबरनाथ शहरात जे दोन नवीन रस्ते या निधीतून उभारण्यात येणार आहेत, त्या रस्त्यांच्या आरक्षित जागेत अनेक अतिक्रमणं आणि लोकांची राहती घरं आहेत. त्यामुळे हे रस्ते उभारताना अनेक घरं आणि अतिक्रमणं हटवावी लागणार असून या रहिवाशांचं पुनर्वसन सुद्धा केलं जाईल, अशी ग्वाही आमदार किणीकर यांनी दिली आहे.

सुसज्ज फायर ब्रिगेड खरेदी करण्यासाठीही शासनाकडून निधी

या रस्त्यांसोबतच अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका मिळून एक नवीन सुसज्ज फायर ब्रिगेड खरेदी करण्यासाठीही शासनाने निधी दिला आहे. ही फायर ब्रिगेड परदेशातून मागवण्यात येणार असून तिला 70 मीटर उंचीची हायड्रॉलिक शिडी आहे. त्यामुळे 22 मजल्यांच्या टोलेजंग इमारतीत लागलेली आग सुद्धा या शिडीच्या साहाय्याने विझवता येणार असून उंच इमारतींना अग्निसुरक्षा मिळणार आहे. (Funds of Rs 14.5 crore for roads in Ambernath, tall buildings will now get fire protection)

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.