AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagat Singh Koshyari : मुंबईतून गुजराती, राजस्थानी काढल्यास काही पैसाच उरणार नाही, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं मोठं विधान

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तर राज्यपालांवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासहित सर्वांनी टीकेची झोड उडवली होती. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोशारी हे पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानाने चर्चेत आले आहेत. 

Bhagat Singh Koshyari : मुंबईतून गुजराती, राजस्थानी काढल्यास काही पैसाच उरणार नाही, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं मोठं विधान
मुंबईतून गुजराती, राजस्थानी काढल्यास काही पैसाच उरणार नाही, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं मोठं विधानImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2022 | 10:53 PM
Share

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि गेल्या अडीच वर्षातलं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) यांच्यातला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. विविध मुद्द्यांवर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावरती अनेकदा टीका झाली आहे. तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ही राज्यपालांवरती अनेकदा टीकेचे बांध सोडले गेले आहेत. महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली बारा आमदारांची यादी असो, किंवा विधानसभा अध्यक्षांची रखडलेली निवड असो, हे सर्व मुद्दे गेल्या सरकारच्या काळात चांगलेच गाजले आहेत. तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तर राज्यपालांवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासहित सर्वांनी टीकेची झोड उडवली होती. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोशारी हे पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानाने चर्चेत आले आहेत.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबई बाबत एक मोठं विधान केला आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता

त्यामुळे याही विधानाचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. तसेच यावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया ही उमटण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या राजकारणात मुंबईला एका अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी अनेक योध्यांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. त्यानंतर ही मुंबई मोठ्या संघर्षातून महाराष्ट्राला मिळाली आहे. अलीकडचा राजकीय संघर्ष पाहता भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, असा आरोप महाविकास आघाडी कडून सतत होतो. तसेच अलीकडे उद्धव ठाकरे यांनी हे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे. भाजपला संपूर्ण देश मिळाला आहे तरी जसा रावणाचा जीव हा बेंबीत होता, तसा भाजप नेत्यांचा जीव हा मुंबईत अडकलाय असी टीका केलेली आहे. त्यातच आता राज्यपालांचं हे विधानाने  या राजकारणाला आणखी फोडणी पडण्याची शक्यता आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.