ST Bus Accident In Gujarat: महाराष्ट्रातील बसचा गुजरातमध्ये कसा झाला अपघात? धक्कादायक कारण समोर, डिझेलची टाकी…

सुरतमधील उवा गावाजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बसेसची भीषण धडक झाली. एका बसने पेट घेतल्याने 7 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 41 हून अधिक जखमी झाले. ही दुर्घटना सुरत-धुळे मार्गावर घडली असून, यामुळे एसटी बसच्या सुरक्षिततेबाबत आणि तांत्रिक तपासणीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जखमींवर उपचार सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

ST Bus Accident In Gujarat: महाराष्ट्रातील बसचा गुजरातमध्ये कसा झाला अपघात? धक्कादायक कारण समोर, डिझेलची टाकी…
सुरत येथील भीषण अपघातात अनेकांचा मृत्यू
| Updated on: Jun 03, 2026 | 8:37 AM

गुजरातच्या सुरतमध्ये मंगळवारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या भयानक धडकेनंतर एक बस दरीत कोसळून तिने पेट घेतला. आग लागल्याने मोठा स्फोटही झाला, ज्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली. या दुर्दैवी घटनेत 7 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 41 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र मृतांचा आखडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उवा गावाजवळ सुरत-धुळे मार्गावरील या अपघाततामुळे प्रचंड खळबळ माजली. हा अपघात प्रचंड भीषण होता, आत्तापर्यंत कशीबशी फक्त एका मृताची ओळख पटवण्यात यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं.

महाराष्ट्रातील बसचा गुजरातमध्ये कसा झाला अपघात?

गुजरातमध्ये महामंडळाच्या दोन बसेसच्या या भीषण अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. – महामंडळाची बस, त्यांच्यासुरक्षिततेबाबत आणि दर्जाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या बारडोली तालुक्यात उवा आणि माणिकपूर गावांच्या दरम्यान हा अपघात घडला.

गुजरात राज्य परिवहन (एसटी) बसची महाराष्ट्र राज्य परिवहन बसला समोरून धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, गुजरात राज्य परिवहन बसवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला तेव्हा महाराष्ट्र डेपोची बस धुळियाहून नवापूरमार्गे सुरतला जात होती. उवा गावाजवळ सुरत-धुळे मार्गावरील बसने पाण्याच्या टँकरला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटलं. आणि याच नियंत्रण सुटलेल्या बसची समोर येणाऱ्या जामनेर-सुरत या बसशी जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती जामनेर-सुरत बस धाडकन खाली कोसळली.

डिझेलची टाकी फुटल्यामुळे आग ?

ही बस खाली पडली आणि तिने काही क्षणांत पेट घेतला. त्यावेळी काही स्फोटाचा आवाजही आले. डिझेलची टाकी फुटल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग वेगाने पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.  काही प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र इतर अनेक जण आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या अपघातात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं.  दरम्यान मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची तर PMOकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

अपघाताची माहिती मिळताच, बार्डोली अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासकीय पथकं घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्डोलीला पाठवण्यात आले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत-धुळे बसमध्ये 33 प्रवासी, तर जामनेर-सुरत बसमध्ये 26 प्रवासी प्रवास करत होते. मात्र या भीषण अपघातानंतर महामंडळाच्या बस, त्यांच्या सुरक्षिततेचे निकष आणि तांत्रिक तपासणी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Follow Us