AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका, NDRF ची टीम तैनात, ठाणे-पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यातील कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाची जोरदार शक्यता आहे. मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल (Hurricane prediction by IMD in Kokan region).

कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका, NDRF ची टीम तैनात, ठाणे-पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 01, 2020 | 9:21 PM
Share

मुंबई : राज्यातील कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाची जोरदार शक्यता आहे. मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल (Hurricane prediction by IMD in Kokan region). याचा मोठा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसेल. कोकणात जोरदार पाऊसही होईल. संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यभरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. पालघर आणि दमनला वादळाचा जोरदार फटका बसेल, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

हवामान विभागाचे म्हटलं आहे, ” पूर्वेकडील आणि त्याजवळील नैऋत्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र मागील 6 तासात 13 किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. पुढील 6 तासात हे क्षेत्र पूर्वपश्चिम आणि जवळच्या नैऋत्य अरबी समुद्रावर तीव्र होईल. त्यानंतरच्या 24 तासात पूर्वपश्चिम अरबी समुद्रावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. 2 जूनला पहाटे ते उत्तरेकडे सरकेल, नंतर उत्तर-इशान्येकडे वळेल. 3 जूनच्या दुपारी उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात ओलांडून हरिहरेश्वर (रायगड, महाराष्ट्र) आणि दमन दरम्यान हे क्रॉस होण्याची शक्यता आहे.”

मच्छिमारांसाठी इशारा

मच्छिमारांना 2 जूनपर्यंत दक्षिणपूर्व अरबी समुद्र, लक्षद्वीप क्षेत्रात आणि केरळ किनारपट्टीवर आणि पुढे जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. 3 जूनपर्यंत पूर्व मध्य अरबी समुद्र आणि कर्नाटक किनारपट्टीपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 4 जूनच्या दरम्यान महाराष्ट्र किनारपट्टीच्या पूर्वेकडील अरबी समुद्री किनारपट्टी व इशान्य अरबी समुद्र व गुजरात किनारपट्टी येथे जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे म्हणाले, “अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून यामुळे येत्या काही दिवसात पश्चिम किनारपट्टीला चक्री वादळाचा तडाखा बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि विशेषतः मच्छीमारांनी सतर्क राहवे. वसई, पालघर, डहाणू या 3 तालुक्यातील किनारपट्टीवरील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पक्क्या घरात किंवा शाळेत आसरा घ्यावा. जिल्ह्यातील 577 मासेमारी बोटी समुद्रात गेल्या आहेत. त्यापैकी 477 बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा आल्या आहेत. अजूनही 100 बोटी समुद्रात आहेत. त्यांना समुद्रकिनारी येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालघर आणि डहाणूमध्ये 2 एनडीआरएफच्या टीमही तैनात झाल्या आहेत.”

संबंधित बातम्या :

बळीराजाला दिलासा, यंदा चांगले पर्जन्यमान, जून ते सप्टेंबर सरासरीच्या 102% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

सातारा कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, कुठे गारांचा वर्षाव, तर कुठे वादळाने झाडांची पडझड

महापुराचा धसका, कोल्हापुरात धरणांमधून 4 हजार क्सूसेक पाण्याचा विसर्ग

Hurricane prediction by IMD in Kokan region

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी