AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा थंडीचा कडाका कमी असणार, हे आहे कारण

weather Update | राज्यात यंदा थंडी का जाणवत नाही आणि येत्या काही काळात थंडी पडणार का? या प्रश्नाचे उत्तर हवामान विभागाने दिले आहे. यंदा मॉन्सून प्रमाणे थंडीवर एल निनोचा प्रभाव असणार आहे. यामुळे यंदा थंडी जाणवणार नाही.

यंदा थंडीचा कडाका कमी असणार, हे आहे कारण
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 17, 2023 | 4:05 PM
Share

जितेंद्र बैसाने , नंदुरबार, 17 डिसेंबर | यंदा पावसाळा जाणवला नाही. मॉन्सून बरसलाच नाही. अखेर सरासरी न गाठता निरोप घेतला. आता डिसेंबर महिना संपत आला तरी राज्यातील अनेक भागांत थंडी जाणवत नाही. पुणे, नाशिकसारख्या भागांत अजून थंडी जाणवत नाही. या शहरांचे तापमान १२ अंश सेल्सियसच्या वर आहे. राज्यातील अनेक शहरांची परिस्थिती यंदा अशीच आहे. राज्यात यंदा थंडी का जाणवत नाही आणि येत्या काही काळात थंडी पडणार का? या प्रश्नाचे उत्तर हवामान विभागाने दिले आहे. यंदा मॉन्सून प्रमाणे थंडीवर एल निनोचा प्रभाव असणार आहे. यामुळे यंदा थंडी जाणवणार नाही.

थंडी कमी असणार, तापमाण जास्त

एल निनोचा प्रभाव यंदा अधिक आहे. एल निनोमुळे महाराष्ट्रात यावर्षी थंडी कमी असणार आहे. हिवाळ्यात दर वर्षापेक्षा कमी थंडीचा कडाका जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त केला आहे. यामुळे डिसेंबर महिना अर्धा झाला तरी थंडी जाणवत नाही. यंदा थंडी कमी असल्यामुळे उन्हाचा कडाका जास्त असणार आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी तापमान नाशिक आणि जळगावचे होते. जळगाव १२. ७ अंश तर नाशिकचे तापमान १२.३ अंश सेल्सियस होते.

कमी थंडीचा रब्बीवर परिणाम

गहू, हरबारा या पिकांना जास्त थंडीची गरज असते. परंतु यंदा कमी थंडी असल्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील पिकांना थंड वातावरण पोषक असते, मात्र तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज असल्याने रब्बी हंगामातील पिकांचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. अगोदरच शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामात उत्पन्न मिळाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. आता शेतकऱ्यांची सर्व अशा रब्बी हंगामावर लागून होती. मात्र थंडीचे प्रमाण कमी होणार असल्याने पिकांच्या वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरची संकटात वाढ होत असल्याची स्थिती आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत