
हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. यादरम्यान राज्यात थेट पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. ऐन मार्च महिन्यातही पाऊस होणार आहे. अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. आजही अनेक शहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण निर्माण झाले. ढगाळ वातावरण दिसत आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा घातक हवा झाली. मुंबईमधील प्रदूषणात मोठी वाढ झाली. पाऊस, प्रदूषण आणि मध्ये मध्ये उन्हाचा कडाका अशी स्थिती निर्माण झाली. पुणे, नांदेड, बीड, परभणी येथे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. शनिवारी लातूर धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच जोरदार वारेही यादरम्यान वाहण्याची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांतील काही भागात विजांचा कडकाडाटासह पाऊस होईल.
मार्च महिन्यातही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होताना दिसला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा वर्तवण्यात आला. काही दिवसांपूर्वीच राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
काल दिवसभर हवामानात मोठा चढउतार बघायला मिळाला. उकाडा अधिक जाणवत होता. सकाळी पुन्हा वातावरणात मोठा बदल झाला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात हवामानात चढउतार बघायला मिळेल. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकणात उष्णता अधिक वाढेल आणि उष्ण वातावरण अधिक राहण्याचा अंदाज आहे.
काही भागात आजही पारा 40 च्या पार जाण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील सर्वच भागात हवामानात बदल दिसतील. विदर्भात उन्हाचा कडाका अधिक जाणवत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 37 च्या पार आहे. यामध्येच अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून थोडातरी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. देशातील इतर राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.