AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse : सरळ सामना करण्याची ताकद नाही, म्हणून तपास यंत्रणांच्या आडून छळ; एकनाथ खडसेंचा गिरीष महाजनांवर हल्लाबोल

काहीही तथ्य नसताना शोधा, असे सांगणे म्हणजे निव्वळ आकसापोटी आणि राजकीय सुडापोटी कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले. ईडी, सीबीआय, अँटी करप्शन अशा कारवाया सुरू आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Eknath Khadse : सरळ सामना करण्याची ताकद नाही, म्हणून तपास यंत्रणांच्या आडून छळ; एकनाथ खडसेंचा गिरीष महाजनांवर हल्लाबोल
एकनाथ खडसे/गिरीष महाजनImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 5:12 PM
Share

मुक्ताईनगर, जळगाव : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जळी, स्थळी नाथाभाऊ दिसतो. गिरीश महाजन यांच्यामध्ये माझ्या समोर सरळ सामना करण्याची ताकद नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. ते मुक्ताईनगरात बोलत होते. वेगवेगळ्या मार्गाने अडकवण्याचा प्रयत्न आजचा नाही, तर पहिल्यापासूनचा आहे. भोसरी प्रकरणात झोटिंग चौकशी झाली. कुठलाही तथ्य (Anti Corruption Bureau) समोर नाही. झोटिंग प्रकरण आटोपले, नंतर पुण्यात एफआयआर दाखल झाला. ही चौकशी अँटी करप्शनकडे गेली. पुण्याच्या अँटी करप्शनने विस्तारित चौकशी केली. त्या चौकशीअंती एकनाथ खडसे निर्दोष आहेत. या प्रकरणात काहीही तथ्य नाही, असा अहवाल अँटी करप्शनने न्यायालयात सादर केल्याचे खडसे यांनी सांगितले. जावयाला अटक केल्यावरूनही त्यांनी भाजपावर टीका केली.

‘आकसापोटी कारवाई’

नाशिकच्या अँटी करप्शनने चौकशी केली. त्यांनीही क्लोजर रिपोर्ट सादर करत यात तथ्य नसल्याचे सांगितले. आता याच प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. म्हणजे एकाच प्रकरणाच्या अशा चौकशा केल्या जात आहेत. काहीही तथ्य नसताना शोधा, असे सांगणे म्हणजे निव्वळ आकसापोटी आणि राजकीय सुडापोटी कारवाई सुरू असल्याचे ते म्हणाले. ईडी, सीबीआय, अँटी करप्शन अशा कारवाया सुरू आहेत. दाऊदच्या कुटुंबीयांशी संबंध असल्यावरून एटीएसची कारवाई झाली, असे एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचादेखील त्यांनी निषेध केला आहे.

‘ज्यांचे मीठ खाल्ले त्यांच्यावरच अशास्वरुपाचे उपकार?’

विविध तपास यंत्रणांच्या चौकशीत नाथाभाऊ निर्दोष सिद्ध झाल्यानंतरही केवळ छळ करण्याचा हा प्रकार आहे. जावयाला जेलमध्ये टाकणे ज्यांच्या घरी गिरीष महाजन, देवेंद्र फडणवीस लंडनला जेवण केले. तीन दिवस त्यांच्याकडे होते. ज्यांचे मीठ खाल्ले त्यांच्यावरच अशास्वरुपाचे उपकार त्यांनी केले. त्यामुळे केवळ छळवणूक सुरू आहे. कोणत्याही तपासामध्ये, चौकशीमध्ये तथ्य आढळत नसतानाही काहीतरी शोधा आणि नाथाभाऊंना जेलमध्ये टाका, यासाठी कारस्थाने सुरू आहेत. मात्र जनता हे सर्व पाहत आहे. निवडणुकीत जनता याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.