AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे बडे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे, एकनाथ शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?

सुब्रमण्यम स्वामी यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दल केलेले्या विधानावर आता शिंदे गटाकडून भूमिका मांडण्यात आली आहे.

भाजपचे बडे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे, एकनाथ शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?
| Updated on: Dec 24, 2022 | 6:09 PM
Share

संजय सरोदे, जालना : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. एकेकाळी भाजपची खमक्यापणाने बाजू मांडणारे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज जणूकाही स्वत:चा पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामागचं कारणही अगदी तसंच आहे. कारण सुब्रमण्यम स्वामी यांनी आजच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान धक्कादायक विधानं केली आहेत. विशष म्हणजे त्यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक सरकार असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचा इतका मोठा नेता एवढं मोठं विधान करतो तेव्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजणं अर्थातच स्वभाविक आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या वक्तव्यावर आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शिंदे गटाचे उपनेते आणि माजी खासदार अर्जुन खोतकर यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या विधानावर भूमिका मांडलीय. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत आश्चर्य व्यक्त केलंय.

“एवढी मोठी माणसं असं बेताल बोलतात तरी कसं? हे समजतच नाही. शिंदे सरकार संविधानाच्या चौकटीत राहून स्थापन झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली.

“आपली लोकशाही संख्या बळावर अवलंबून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेत त्या संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार स्थापन केलल आहे”, अशी भूमिका अर्जुन खोतकर यांनी मांडली.

सुब्रमण्यम स्वामी शिंदे-फडणवीस सरकारवर नेमकं काय म्हणाले?

“शिंदे-फडणवीस सरकार महाविकास आघाडी तोडून बनवलं आहे. निवडणूक लढवून सरकार निर्माण केलेलं नाही. आमदार फोडून सरकार बनवलं हे बरोबर नाही. हरयाणात एकदा शंभर टक्के इंदिरा काँग्रेस झाली होती. हा जोक मी पाहिला आहे. त्यावर लोक हसत होते. त्यामुळे इंदिरा गांधींची खूप बदनामी झाली होती. आता आमचीही बदनामी झाली आहे”, अशी रोखठोक भूमिका सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली.

“सरकार फोडून नवं सरकार बनवण्याची गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. ही खिचडी होती अधिक काळ चालली नसती”, असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.