AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे बडे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे, एकनाथ शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?

सुब्रमण्यम स्वामी यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दल केलेले्या विधानावर आता शिंदे गटाकडून भूमिका मांडण्यात आली आहे.

भाजपचे बडे नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे, एकनाथ शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?
| Updated on: Dec 24, 2022 | 6:09 PM
Share

संजय सरोदे, जालना : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. एकेकाळी भाजपची खमक्यापणाने बाजू मांडणारे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज जणूकाही स्वत:चा पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामागचं कारणही अगदी तसंच आहे. कारण सुब्रमण्यम स्वामी यांनी आजच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान धक्कादायक विधानं केली आहेत. विशष म्हणजे त्यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक सरकार असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचा इतका मोठा नेता एवढं मोठं विधान करतो तेव्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजणं अर्थातच स्वभाविक आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या वक्तव्यावर आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

शिंदे गटाचे उपनेते आणि माजी खासदार अर्जुन खोतकर यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या विधानावर भूमिका मांडलीय. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत आश्चर्य व्यक्त केलंय.

“एवढी मोठी माणसं असं बेताल बोलतात तरी कसं? हे समजतच नाही. शिंदे सरकार संविधानाच्या चौकटीत राहून स्थापन झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली.

“आपली लोकशाही संख्या बळावर अवलंबून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेत त्या संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार स्थापन केलल आहे”, अशी भूमिका अर्जुन खोतकर यांनी मांडली.

सुब्रमण्यम स्वामी शिंदे-फडणवीस सरकारवर नेमकं काय म्हणाले?

“शिंदे-फडणवीस सरकार महाविकास आघाडी तोडून बनवलं आहे. निवडणूक लढवून सरकार निर्माण केलेलं नाही. आमदार फोडून सरकार बनवलं हे बरोबर नाही. हरयाणात एकदा शंभर टक्के इंदिरा काँग्रेस झाली होती. हा जोक मी पाहिला आहे. त्यावर लोक हसत होते. त्यामुळे इंदिरा गांधींची खूप बदनामी झाली होती. आता आमचीही बदनामी झाली आहे”, अशी रोखठोक भूमिका सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली.

“सरकार फोडून नवं सरकार बनवण्याची गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. ही खिचडी होती अधिक काळ चालली नसती”, असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.