AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांच्या कानात काय बोळे घातलेत का?; मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार; म्हणाले, त्यांच्या कानात काय बोळे घातलेत का? टीव्ही 9 मराठी च्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं मनोज जरांगे यांना चर्चेचं आवाहन, त्याला मनोज जरांगे पाटील यांचं उत्तर...

त्यांच्या कानात काय बोळे घातलेत का?; मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार
Manoj Jarange Patil
| Updated on: Oct 29, 2023 | 12:39 PM
Share

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 29 ऑक्टोबर 2023 : राज्यातील अवघा मराठा समाज मराठा आरक्षणाकडे डोळे लावून बसलेला आहे. ठिकठिकाणी मोर्चे आंदोलनं होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत देऊनही सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत प्रसिद्ध झाली. यात फडणवीसांनी सरकार जरांगे यांच्या चर्चा करायला तयार असल्याचं म्हटलं. यावरूनच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या कानात बोळे घातलेत काय? या म्हटलं ना, चर्चेला… फक्त एकदाच चर्चेला या. मला बोलता येते का बघा. आजच्या आज या. त्यानंतर मला मला बोलता येणार नाही. माझी परिस्थिती आहे. फक्त एकदाच या. आरक्षण द्यायचं की नाही सांगा. बाकीची वळवळ करू नका, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस काय म्हणाले?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत झाली. यात त्यांनी जरांगे यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. मी जरांगेंना काही सांगणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली आहे. ते कमिटेड आहे. मी स्वत सांगतो, मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण होण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार. सरकार गांभीर्याने काम करत आहे. त्यांनीही सरकारसोबत चर्चा केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाहीने आयुध दिलं. त्यात उपोषण आहे. आम्ही गांभीर्याने घेतलं. चर्चाच झाली नाही तर कसं होईल. चार आयडिया आमच्या असतील. चार आयडिया त्यांच्या असतील. यावर चर्चा व्हावी. पण चर्चा काही माधमांच्या कॅमेरा समोर होत नसते. हे पण त्यांनी लक्षात घ्यावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मुलाखतीत म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्या या आवाहनाला मनोज जरांगे पाटील यांनी आता उत्तर दिलं आहे.

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.