AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil Flim | मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून येणार, चित्रपटाचे निर्माते म्हणतात,…

जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपट काढणार आहोत. ११ दिवसांचा संघर्ष लोकांना माहीत आहे. पण, त्या पाठीमागे जरांगे पाटील यांचा मोठा संघर्ष आहे. यामागचा संघर्ष अतिशय भयानक आहे. तो संघर्ष महाराष्ट्राला माहीत व्हावा. देशाला त्यांचा संघर्ष कळणं गरजेचं आहे.

Manoj Jarange Patil Flim | मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून येणार, चित्रपटाचे निर्माते म्हणतात,...
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Sep 08, 2023 | 8:06 PM
Share

संजय सरोदे, जालना, ८ सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या ११ दिवसांपासून उपोणण करत आहेत. जरांगे पाटील यांनी आतापर्यंत बराच संघर्ष केला. त्यांचा संघर्ष चित्रपटात रुपांतरित होणार आहे. त्यासाठी आज चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते. लेखक, निर्माता गोवर्धन दोलतळे म्हणाले, जरांगे पाटील यांनी गेल्या ११ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आलो आहोत. जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपट काढणार आहोत. ११ दिवसांचा संघर्ष लोकांना माहीत आहे. पण, त्या पाठीमागे जरांगे पाटील यांचा मोठा संघर्ष आहे. यामागचा संघर्ष अतिशय भयानक आहे. तो संघर्ष महाराष्ट्राला माहीत व्हावा. देशाला त्यांचा संघर्ष कळणं गरजेचं आहे.

हरणार नाहीतर मरणार अशी लढाई

मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षामुळे यश मिळताना दिसत आहे. हरणार नाहीतर मरणार अशी लढाई यांनी लढली आहे. तयारीनिशी ते रणांगणात उरतले आहेत. जरांगे पाटील यांचे वास्तव काय, हे चित्रपटाच्या माध्यमातून सांगणार आहोत. संघर्षयोद्धा असं या चित्रपटाला नाव दिलंय. उद्याच्या येणाऱ्या पिढीला माहीत व्हावं. इतिहासात त्यांची नोंद झाली पाहिजे. जरांगे पाटील यांचे विचार या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवले जाणार आहेत. राज्यातील जनता सपोर्ट करतील. जरांगे पाटील यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.

कलाकार रोहण पाटील म्हणतात, १५ किलो वजन कमी करणार

रोहण पाटील हे जरांगे पाटील यांची भूमिका करणार आहेत. पाटील म्हणाले, जरांगे पाटील यांचे उपोषण हे राज्यभर पोहचले आहे. फक्त ११ दिवसांचा संघर्ष नव्हे तर त्यांच्या जीवनातील संघर्ष हा राज्यातील जनतेच्या भेटीला आला पाहिजे. हे चित्रपटाच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे. या भूमिकेसाठी १५ किलो वजन कमी करणार आहे. थरारक अशी भूमिका करणार आहे. तळमळीचा कार्यकर्ता मी साकारणार असल्याचं रोहण पाटील यांनी म्हंटलं.

दिग्दर्शक म्हणाले, या चित्रपटाचे नाव संघर्षयोद्धा आहे. वास्तविकता दाखवायचं आहे. समाजासाठी स्वतःचं आयुष्य घालवलं आहे. आतापर्यंत ते समाजासाठी जगत आले आहेत. ते चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडणार आहोत.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?