जितेंद्र आव्हाडांचं प्रकरण सूर्याएवढं स्वच्छ, गिरीश महाजनांनी हाणला टोला…

जितेंद्र आव्हाड यांचे प्रकरण सुर्या एवढ स्वच्छ आहे असा टोला गिरीश महाजन यांनी त्यांना लगावला आहे.

जितेंद्र आव्हाडांचं प्रकरण सूर्याएवढं स्वच्छ, गिरीश महाजनांनी हाणला टोला...
जितेंद्र आव्हाड (File Photo)Image Credit source: tv 9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 4:40 PM

नंदुरबार: गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा झालेल्या आरोपावरुन ढवळून निघाले आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे प्रकरण सुर्या एवढ स्वच्छ आहे टोला त्यांनी लगावला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आव्हाडांनी आधीच्या लोकांना केलेली मारहान हे काय आहे. आणि त्यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला.

आधीच्या महाविकास आघाडी सरकाने अडीच वर्षात नारायण राणे, मला, राणा दांपत्य, कंगणा राणावत यांच्यावर केलेली कारवाई ही सुडबुद्धीने झालेली नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गिरीश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्यावेळी टीका करताना ते म्हणाले की, लोकांनी पाहीले आहे की, तुम्ही महिलेला दोन्ही हात धरुन कसं ढकलला आहे ते. त्यामुळे आव्हाडांवरील कारवाई ही नियमानुसार झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी टीका करताना राष्ट्रवादीचेच नेत्यांवरही त्यांनी निशाणा साधला. काल जळगाव जिल्हा दूध संघावर झालेली कारवाईबाबतही त्यांनी टीका टिप्पणी केली.

त्या दूध संघातील पहिली अटक करुन कारवाईला सुरू झाली असून त्यामधील लिमये यांना अटक केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुमच्याच तक्रारी आणि तुमचीच चौकशी सुरु असल्याचा जोरदार हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, तसेच राजकीय भावनेने कोणतीही चौकशी होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, एकनाथ खडस यांना सर्व पदे घरात पाहीजे. त्यांचे संपुर्ण कुटुंब तूप आणि लोणी खात असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

यावेळी त्यांनी खडसे यांच्यावर टीका करता करता त्यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावरही आरोप केले आहेत.

खासदार संजय राऊत आणि अजित पवार यांनी मध्यवर्ती निवडणुकांविषयी बोलल्यावर त्याविषयी बोलतानाही त्यांनी थेट भाष्य करत सांगितले की, आमच्याकडे 167 लोक आहेत.

त्यामुळे मध्यावर्ती निवडणुकांचा मुद्दा हा हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री मंडळावर विचारले असता मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटात आता 18 पैकी 13 खासदार झाले आहेत आणि येत्या दोन पाच दिवसात पंधरा होतील.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.