AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2019 मध्ये राष्ट्रपती राजवट होती… त्यावेळी मी दररोज का बोलत होतो? संजय राऊत यांनी स्वतःच सांगून टाकलं, काय होतं कारण?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 2019 च्या निवडणुकीमध्ये दररोज का बोलत होतो याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. याशिवाय भाजपला एक खुलं आव्हान देखील दिलं आहे.

2019 मध्ये राष्ट्रपती राजवट होती... त्यावेळी मी दररोज का बोलत होतो? संजय राऊत यांनी स्वतःच सांगून टाकलं, काय होतं कारण?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 07, 2023 | 3:00 PM
Share

कर्जत : बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकंच स्थान शरद पवार यांचे देखील आहे असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जत येथील जाहीर मुलाखतीत केले आहे. याशिवाय शरद पवार यांना कधीही काळोखात भेटलो नाही त्यांचे मला अनेकदा मार्गदर्शन आणि आधार लाभला आहे. त्यामुळे 2019 ला निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली होती. त्यानंतर खाली येऊन गाडीत बसलो आणि थेट सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घ्यायला गेलो होतो. तिथे माझ्या मुलाखती घेतल्या त्यावेळी मला विचारलं इथं कशाला आले, मी लपून काहीच ठेवलं नव्हतं. मी सरकार बनवायला आलोय असं जाहीर केलं होतं म्हणत संजय राऊत यांनी कर्जतच्या मुलाखतीत म्हंटलं आहे.

हिंदू हिंदू असं म्हणत रस्त्यावर फिरताय मात्र आमचं हिंदुत्व असं नाही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व आहे आणि आमच्या हिंदुत्वाचा आधार हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अखंड हिंदुस्तान करण्याच्या गोष्टी करतात, 24 कोटी मुसलमान आहे. त्यांना संपवून टाका आणि करा अखंड हिंदुस्तान. निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान तणाव निर्माण करतात. तो तणाव कशाला करतात भारत चीन तणाव करा असं खुला आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे.

भारत देश हा हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. निवडणुका या कागदावर घ्या, असा आम्ही वारंवार सांगतोय मात्र, दुसरीकडे त्यांना मुंबई ला सुद्धा तोडायचे आहे. मात्र, ते आम्ही होऊ देणार नाही, ही सर्व व्यापारी मंडळी आहे अशी टीका भाजपावर संजय राऊत यांनी केली आहे.

देशामध्ये निवडणुका आला की भारत पाकिस्तानचा मुद्दा समोर येतो. तणाव निर्माण केला जातो. मात्र यापुढे तसं होणार नाही. लोकं सुज्ञ झाली आहे. निवडणुकीची वाट बघत आहे. 2024 ला देशात सत्तांतर झालेले दिसेल असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

2019 च्या दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. असं असताना मी दररोज बोलत होतो. यामागे बूस्टर डोस देण्याची गरज होती. असंही कर्जत येथील जाहीर मुलाखतीत संजय राऊत यांनी सांगत गौप्य स्फोट केला आहे. त्यामुळे राजकारणात आता नवी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.