AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून वाल्मिकच्या एन्काउंटरची सुपारी दिली असेल, करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला  देण्यात आली होती, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी  रंजित कासले यांनी केला आहे, यावर आता करुणा शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

...म्हणून वाल्मिकच्या एन्काउंटरची सुपारी दिली असेल, करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2025 | 4:51 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलं आहे, सध्या ते कारागृहात आहेत. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलंबित पोलीस अधिकाऱ्यानं मोठा दावा केला आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड याच्या   एन्काऊंटरची ऑफर आपल्याला  देण्यात आली होती, असा दावा निलंबित पोलीस अधिकारी  रंजित कासले यांनी केला आहे. रंजित कासले यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान आता रंजित कासले यांच्या या दाव्यावर करुणा शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमंक काय म्हणाल्या करुणा शर्मा?  

वाल्मिकच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबतचा दावा खरा असू शकतो.  आज किती जरी काही केलं तरी ते पोलीस अधिकारी आहेत, ते खरं बोलत असणार. त्यांना वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली असेल. कारण धनंजय मुंडेंचे सगळे काळे कारनामे वाल्मिक कराडकडे आहेत, त्यामुळे होऊ शकतं.  पाच कोटी ही खूप छोटी रक्कम आहे. या लोकांकडे प्रचंड पैसा आहे. आज तुम्ही बघा एका मंत्र्याचं बजेट 45 -45 हजार कोटींच असतं. त्यामुळे पाच कोटी ही फार थोडी रक्कम आहे, ते शंभर कोटी रुपये देखील देऊ शकतात.

इथे सगळं राजकारण पैशांच्या जोरावरच चालू आहे. आज तुम्ही बघू शकता मोठ-मोठे कांड लोकांच्या समोर आलेले आहेत. वाल्मिक कराड तर एक मोहरा आहे. अंजलीताई दमानिया तर दररोज नव-नवे खुलासे करत आहेत, मात्र अनेक प्रकरणं पैशांच्या जोरावर दाबले जात आहेत, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान तुम्ही मागणी केली आहे की, रणजित कासले यांना पुन्हा एकदा कामावर घ्यावं, मात्र त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, असा प्रश्नही यावेळी करुणा शर्मा यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की,  जर पोलीस अधिकाऱ्यांची ही अवस्था आहे तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.