AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मविआपाठोपाठ मनसेलाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य…

MNS Leader on EVM and Assembly Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीपाठोपाठ आता मनसेनेदेखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. मनसे नेत्याने याबाबतचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर बातमी..

मविआपाठोपाठ मनसेलाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य...
Raj ThackerayImage Credit source: ANI
| Updated on: Nov 27, 2024 | 12:19 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 230 जागा जिंकत महायुती सत्तेत आली आहे. तर केवळ 49 जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं आहे. मनसेला तर एकही जागा जिंकता आलेली नाही असं असताना ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीने संशय व्यक्त केलेला असतानाच मनसेने देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. मागच्या काही दिवसापासून जे व्हीडिओ समोर येत आहेत. ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही दहा वर्ष जे आमदार भेटत नव्हते ते आमदार एकेक लाखाच्या मताने निवडून आलेत. ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला आहे. ईव्हीएममुळे अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे, असं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

मनसेला ईव्हीएमवर संशय

एवढा मोठा विजय मिळवून देखील भारतीय जनता पक्षात आनंद व्यक्त होत नाही. ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष किती एकत्र एकत्र आला तरी होणार काही नाही. देशात काहीतरी चुकीचं चाललंय हे आता कळलं पाहिजे. अमेरिका सारख्या देशात जर बॅलेट वर मतदान होत असेल तर मग इथे कशाला ईव्हीएम पाहिजेत. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसेची सुद्धा फसवणूक झाली आहे. न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांची मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? या पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही असा प्रश्न आता मला पडला आहे. हा निकाल सेट होता सगळेच यांचे निवडून आले असते तर लोकांनी यांना चपलेने मारलं असतं, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

अविनाश जाधव काय म्हणाले?

ईव्हीएमबाबत राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील. उमेदवारांना लोक शिव्या घालत होते त्या लोकांना… निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लाट होते ही दिसत नव्हती या उलट भारतीय जनता पक्षाबद्दल चा राग दिसला. निवडणुकीत एक पिक्चर तयार केला. त्यात लाडकी बहीण बसवली, बटेंगे तो कटिंग हे बसवलं गेलं. निकालानंतर मनसेच्या झालेल्या बैठकीत राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. लवकरच राज ठाकरे यावर बोलणार आहेत…, असं जाधव म्हणाले.

राज ठाकरे जेव्हा बोलतील त्यावेळी राज्याला कळेल ह्या निवडणुकीमध्ये काय काय झालं. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत आमची कोणतीही अपेक्षा नाही. मनसे आणि राज ठाकरे यांची फसवणूक महायुती एवढी कोणीच केली नाही. लोक सभेवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र त्याची परतफेड आता महायुतीने कशी केली आहे हे तुम्हीच बघताय, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.