AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना?

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी! 'त्या' लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना?
| Updated on: Jan 16, 2025 | 11:18 PM
Share

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. डिसेंबरपर्यंतचे हाप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार त्याकडे. त्यासोबतच 2100 रुपयांचा हाप्ता कधीपासून मिळणार असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आता या योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.

नेमकं काय म्हणाल्या तटकरे?   

डिसेंबरचा हाप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आता 26 जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हाप्ता देखील मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. ही योजना सुरूच राहणार आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ असं अश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलं होतं. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे यावर देखील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या आधी यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि त्यानंतरच्या काळात यावर सकारात्माक विचार होणार आहे, मात्र आता 1500 रुपयांचाच लाभ मिळणार आहे. यासाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितलं की डिसेंबरपर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली, अशा महिलांनी लाभ परत केला. ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिला या योजनेतून कमी होतील.  ज्या महिलांचे या योजनेंतर्गत एकापेक्षा अधिक खाती आहेत, त्या महिलांना कमी केलं जाईल. जास्त काही फरक पडणार नाही, मात्र एखादा टक्का महिला योजनेतून कमी होतील असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.