AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार कुठे भरला?

उदयपुर येथील राजेशाही घराण्यात खास वाढलेल्या घोड्याचा वंश असलेली घोडी या घोडे बाजारात दाखल झालेली होती.

देशातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार कुठे भरला?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 04, 2022 | 6:15 PM
Share

येवला, नाशिक : देशातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार आज नाशिकच्या येवला (Nashik Yeola) येथे भरविण्यात आला होता. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) आवारात हा बाजार भरविण्यात आला होता. येवला येथे भरविण्यात आलेला घोडे बाजाराचे (Horse Market) खास वैशिष्टे आहेत. इतिहासकालीन असलेला हा घोडेबाजार तीनशे वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. येवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांच्या पुढाकाराने हा बाजार भरविण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात हा घोडे बाजार प्रसिद्ध आहे. विविध राज्यातील व्यापारी आणि खरेदीदार या बाजारात सहभागी होत असतात त्यामुळे बाजार समितीच्या अर्थकारणाला अधिकचा हातभार लागत असतो. यंदाच्या घोडे बाजार काही खास वैशिष्टे देखील होते.

उदयपुर येथील राजेशाही घराण्यात खास वाढलेल्या घोड्याचा वंश असलेली घोडी या घोडे बाजारात दाखल झालेली होती.

या घोडीची किंमत तब्बल 61 लाख रुपये लावण्यात आली होती. 61 लाखांची घोडी आहे तरी कशी हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती.

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील घोडे बाजार प्रसिद्ध असून पंजाब,गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा यांसह देशातील विविध राज्यातील विक्रेते आणि खरेदीदार यांच्यासह व्यापारी सहभागी झाले होते.

या घोड्यांच्या बाजारात विविध प्रजातीचे घोडे आणलेले असतात. त्यात शर्यतीचे घोड्यांची संख्या जास्त असते. याशिवाय इतिहासाशी संबंधित असलेले घोड्यांचे वंशज प्रामुख्याने येथे बघायला मिळतात.

पाच लाखांपासून सत्तर लाखा रुपये किंमतीचे घोडे या बाजारात आणलेले असतात. त्यामुळे असे घोडे खरेदी किंवा विक्री करण्याची मोठी संधी महाराष्ट्रातील घोडेप्रेमींना मिळत असते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.