AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले’, अमित देशमुख यांचा निशाणा कुणावर?

"लातूर मतदारसंघात कोण उभे आहे याचा जास्त विचार करायचा नाही. तुम्ही स्वतः अमित देशमुख आहे असं समजून प्रचाराला लागा. मी अमित देशमुख आहे म्हणजे मी लातूर आहे, मी लातूर आहे म्हणजे महाराष्ट्र आहे, ही संकल्पणा ठेवा", असं आवाहन अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केलं.

'महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले', अमित देशमुख यांचा निशाणा कुणावर?
अमित देशमुख
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 29, 2024 | 7:13 PM
Share

“महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई, दादा आणि भाऊने राज्याचे वाटोळे केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात आमदार फोडण्याची, खरेदी विक्रीची संस्कृती सुरू झाली आहे. त्यामुळे आपण राज्य वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे”, असं म्हणत काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी महायुती आणि भाजपवर निशाणा साधला. “आजचा दिवस लातूरकरांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नावावर करून दिला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण होत आहे. त्यांच्या अशा सभा अविस्मरणीय असायच्या. त्यामुळे आजच्या सभेला बघून त्यांची आठवण होते. लातूरला काँग्रेसने घडवले आणि विरोधी पक्ष विचारतो तुम्ही काय केले? लातूरला जिल्ह्याचा दर्जा बॅरिस्टर अंतुले यांनी दिला. विलासराव देशमुख यांची ती मागणी होती. रेल्वे, एअर पोर्ट, बस स्थानक, चौफेर विकास केला”, असं अमित देशमुख म्हणाले.

“सुधाकर शृंगारे यांनी भाजपात काय चालते? याचा पर्दाफाश केला. सामान्य दलित नेतृत्वाचा छळ भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केला. तुम्ही काँग्रेसमध्ये आलात आणि लगेच बोलू लागलात. तुमचा आजवर असंगाशी संग होती, तुम्ही बोललात तुम्ही मन हलके केले. त्यांचे माझे जुने सबंध आहेत. ते वेगळ्या विचाराने लढत होते. आम्ही वेगळ्या विचाराने लढत होतो. पण आम्ही कधी पातळी सोडली नाही. त्यांनी आल्याने आमची ताकद वाढली. तुमचे स्वप्न बाबासाहेब आंबेडकर यांचा 72 फुट उंच पुतळा उभा करायचं ते महविकास आघाडी पूर्ण करेल. तुमचा जो प्रमाणिक भाव आहे त्याला योग्य सन्मान मिळेल, तुमचे योग्य पुनर्वसन केले जाईल”, असं आश्वासन अमित देशमुख यांनी दिलं.

“काँगेसचे जिल्ह्यातून तीन उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडीची बागडौर, दिलीपराव देशमुख यांच्या हातात आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढत आहोत. लातूरचे नाव देशभर रोशन करू. विलासराव देशमुख यांची उणीव दिलीपराव देशमुख भासू देत नाहीत. हा काँग्रेसचा गड दिलीपराव देशमुख यांच्यामुळे आहे. महायुती सरकारचा कारभार लोकांपर्यंत आपणाला घेवून जायचा आहे”, असं अमित देशमुख म्हणाले.

‘स्वतः अमित देशमुख आहे असं समजून प्रचाराला लागा’

“लातूर मतदारसंघात कोण उभे आहे याचा जास्त विचार करायचा नाही. तुम्ही स्वतः अमित देशमुख आहे असं समजून प्रचाराला लागा. मी अमित देशमुख आहे म्हणजे मी लातूर आहे, मी लातूर आहे म्हणजे महाराष्ट्र आहे, ही संकल्पणा ठेवा. विरोधकांची चर्चा करू नका. कारण ते चर्चेतच नाहीत. आपण आपला विचार घेवून पुढे जायचे आहे. महायुतीत जो भ्रष्टाचार घडतो आहे त्याचा पर्दाफाश करायचा आहे”, असं अमित देशमुख म्हणाले.

“लातूरच्या कोणत्या ठाण्यात फिर्याद द्यायची असेल तर अधिकारी भेटत नाहीत. अगोदर दलालला भेटावे लागते. म्हणून लातूर आपणाला पारदर्शक घडवायचे आहे. काँग्रेसमुळे सामान्य माणसाला कधी धक्का लागला नाही. माणसे जपण्याचे काम काँग्रेसने केले. लातूरला खूप पुढे घेवून जायचे आहे. 2400 कोटी रुपयांच्या योजना आम्ही आतापर्यंत आणल्या. त्याची बेरीज तुम्ही करा. जाहीरनामा लवकरच येईल. लातूरमध्ये खात्रीने सांगतो महायुती इथे टिकणार नाही. गाव, गल्ली सोडू नका. महाविकास आघाडी येईल यासाठी मतदार आपल्या पाठीशी उभे करा. विरोधकांवर अजिबात टीका करू नका, विचारांची लढाई आहे, ती विचारानेच होईल”, असं आवाहन अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.