AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेत असताना का विरोध केला नाही, राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

राज ठाकरे यांनी आज कणकवलीत जाहीर सभा घेतली. या वेळी बोलताना त्यांनी नारायण राणे यांचं कौतूक केले. नारायण राणे यांना आणखी काही काळ मुख्यमंत्री म्हणून मिळाला असता तर आज येथे प्रचार करण्याची वेळच आली नसती.

सत्तेत असताना का विरोध केला नाही, राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
| Updated on: May 04, 2024 | 9:27 PM
Share

Raj Thackeray Live : राज ठाकरे यांनी आज कणकवलीमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या कामाचं कौतूक केलं. ते म्हणाले की, ‘नारायण राणे यांना माझी गरज नाही. ते निवडून आलेले आहेत. इतका सुंदर हा प्रदेश आहे. येथील जनता सुजान आहे. महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्यापैकी जवळपास ७ हे कोकणातून जातात. एकट्या दापोलीत चार भारतरत्न आहेत. कोण आपलं भलं करु शकतं हे लोकांना माहितीये. कोणाला मुलाखत द्यायच्या नाही असं ठरवलं आहे. विधानसभेला मुलाखती देण्याचे ठरवले आहे.’

‘गुढीपाडव्याच्या सभेत मी पाठिंबा का दिला हे सांगितलं होतं. मला एखादी गोष्ट पटली तर पटली. नाही पटली तर शेवटपर्यंत नाही पटणार. २०१४ ते १९ दरम्यान ज्या गोष्टी नाही पटल्या त्यावर मी जाहीर विरोध केला. आज ही त्या गोष्टी नाही पटत.’

‘कलम ३७० रद्द करण्याबाबत केव्हा पासून मी ऐकत होतो. मोदींनी ते कलम रद्द केलं. ते मोदी सरकारमुळे झाले ते तुम्हाला मान्य करावेच लागेल.बाबरीचा विषय जेव्हा आला तेव्हा देशभरातून कारसेवक तेथे गेले. मुलायम सरकारने अनेक कारसेवकांना गोळ्या घातल्या होत्या. ती घटना अजूनही माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही.न्यायालय आणि मोदी सरकारमुळेच राम मंदिर झाले. त्यामुळे कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली.’

‘माझा हेतू स्पष्ट होता. उद्देश पारदर्शक होता. मला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून माझी भूमिका नसते. गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आधी तुम्ही त्यांच्या सोबत सत्तेत होते. तेव्हा मुख्यमंत्री असताना साडेसात वर्ष सत्तेत असताना तुम्ही विरोध का नाही केला. तेव्हा का उद्योगधंदे जाऊ दिलेत असा सवाल त्यांनी केला.’

‘जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध केला. कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही. नाणारला विरोध झाला. याचा खासदार विरोध करणार. लोकांना भडकवणार. नाणार होणार तिथे जमीन आली कुठून. अनेक दलालांनी जमीन विकत घेतली. मुख्यमंत्री झाल्यावर यांनी म्हटले बारसुला हलवा. आता जमीन कशी सापडली. यांच्याच लोकांनी या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तुमच्याकडे १० रुपयाला घ्यायची आणि सरकारकडून २०० रुपये घ्यायचे. हे सगळे प्रकार सुरु आहे.’

‘कोकण रेल्वे किती वर्षात झाली. तेव्हा असे दलाल फिरत नव्हते म्हणून झाली कोकण रेल्वे. चांगले प्रकल्प यावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. गोव्यात अख्ख जग जातं. पण कोकणाच्या किनाऱ्यावर ते चित्र दिसलं तर मोठी गर्दी होईल. म्हणे आमची संस्कृती बिघडते. दोन वेळचं जेवन देऊ शकत नाही ती कोणती संस्कृती. पक्ष स्थापनेच्या वेळी मी सांगितलं होतं. मलेशियाला एक जागा आहे. तिथे सुरुवातीला फक्त एक हॉटेल होतं.’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.