AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget : “मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी…” उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांनी तीव्र टीका केली. त्यांनी अर्थसंकल्पाला "बोगस" म्हटले आणि सरकारवर कर्जबाजारी महाराष्ट्र निर्माण करण्याचा आरोप केला.

Maharashtra Budget : मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी... उद्धव ठाकरेंचा घणाघात
ajit pawar uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2025 | 5:13 PM
Share

वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली. अजित पवारांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत बोगस अर्थसंकल्प असे म्हणत टोला लगावला.

राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला आज अत्रे यांची आठवण आणि ते असते तर आज बोलले असते एवढ्या दहा वर्षात बोगस अर्थसंकल्प पाहिला नव्हता, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी घणाघात केला.

दहा वर्षात बोगस अर्थसंकल्प पाहिला नव्हता

“मला आज अत्रे यांची आठवण झाली. ते असते तर आज बोलले असते, एवढ्या दहा वर्षात बोगस अर्थसंकल्प पाहिला नव्हता. सार काढायच झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे. त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळणार आहे असा अर्थसंकल्प आहे. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी ही ओळ त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही थापा मारु असं त्यांच सुरु आहे. बहुमत मिळालेलं हे सरकार आहे. दहा थापा होत्या ते आज यांनी केलंय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

जीवनावश्यक वस्तू स्थिर केव्हा ठेवणार…?

“शेतकऱ्यांना कर्जमाफी यांनी केलीय का? शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा केव्हा देणार…? तुमचं सरकार स्थिर असताना जीवनावश्यक वस्तू स्थिर केव्हा ठेवणार…? आजच्या अर्थसंकल्पमध्ये काय आहे सामान्य माणसासाठी, काही नाही पण कॉन्ट्रॅक्टरसाठी खूप काही आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

2024 निवडणुकीत बोलले होते, त्यातील एक गोष्ट केलीय का?

“दोन विमानतळ जोडण्याचे कामही सरकार करणार म्हटले आहेत. पण हे अदानीचे काम आहेत तुम्ही तुमच्या मालकाची काम करणार आहात का? शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा केली. पण आता शेतकऱ्यांना बिल यायला लागली त्याच तुम्ही काय करणार आहात? थापानामा किंवा झोलानामा म्हणा. त्यांनी 2024 निवडणुकीत बोलले होते, त्यातील एक गोष्ट तरी आज केलीय का?” असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.

“अत्यंत बोगस अर्थसंकल्प आहे. असा अर्थसंकल्प गेल्या दहा वर्षात पाहिला नाही. मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष