AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी कृष्णाचा अवतार, तर कधी शिवाचा… महाराष्ट्रातील दोन शहरांत सर्वाधिक भोंदूबाबा अटकेत, तुमचं शहर यात आहे का?

महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गेल्या महिन्यात १४ भोंदू बाबांवर गुन्हे दाखल झाले असून मुंबई आणि नाशिकमध्ये सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. सुशिक्षित नागरिकांची फसवणूक आणि महिलांच्या शोषणाचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

कधी कृष्णाचा अवतार, तर कधी शिवाचा... महाराष्ट्रातील दोन शहरांत सर्वाधिक भोंदूबाबा अटकेत, तुमचं शहर यात आहे का?
maharashtra superstition
| Updated on: Apr 30, 2026 | 11:31 AM
Share

राज्यभरात गाजलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आणि सामाजिक संस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या ३० दिवसांत राज्याच्या विविध जिल्ह्यांतून भोंदू बाबांबद्दल धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. यानुसार, गेल्या महिनाभरात १४ भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरी भागातील सुशिक्षित नागरिकांची होणारी फसवणूक चिंतेचा विषय ठरत आहे.

नाशिक आणि मुंबईत सर्वाधिक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या एका महिन्यात १४ भोंदू बाबांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या नोंदवण्यात आलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वाधिक गुन्हे हे मुंबईतील आहे. मुंबईतून ४ भोंदूबाबांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये ३ भोंदू बाबांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर उर्वरित गुन्हे राज्याच्या विविध जिल्ह्यांत विभागलेले आहेत. आतापर्यंत असा समज होता की भोंदूगिरी केवळ ग्रामीण भागात चालते, परंतु या ताज्या आकडेवारीवरून मुंबई आणि नाशिकसारख्या महानगरांमध्येही बुवाबाजी मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचे सिद्ध झाले आहे.

अवताराच्या नावाखाली महिलांचे शोषण

या प्रकरणांमध्ये समोर आलेली गुन्ह्यांची पद्धत अत्यंत भयावह आहे. आरोपींनी स्वतःला कृष्णाचा अवतार किंवा शिवाचा अवतार सांगत महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. कौटुंबिक अडचणी, आजारपण किंवा मानसिक त्रासावर उपाय करण्याच्या बहाण्याने या महिलांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करण्यात आले. अध्यात्माचा आधार घेऊन महिलांवर अत्याचार करणाऱ्या या भोंदू बाबांच्या टोळ्या आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

तसेच अशोक खरात प्रकरणानंतर पीडित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती झाली आहे. यामुळेच अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे प्रकार आता पोलिसांपर्यंत पोहोचत आहेत. खटला भरताना प्रामुख्याने महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा २०१३ अंतर्गत कारवाई केली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. भोंदूगिरी नष्ट करण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नाही, तर लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे. अंनिसच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी अशा भोंदू बाबांचा शोध सुरू असून, पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी स्पष्ट केले.

Follow Us
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ