AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसमोर आभाळाएवढं दु:ख, पावसाअभावी हातातून पैसा मिळवून देणारं पीक जाणार

राज्यातील विविध भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून पैसा मिळवून देणारं पीक जाण्याची भीती वाटू लागली आहे.

शेतकऱ्यांसमोर आभाळाएवढं दु:ख, पावसाअभावी हातातून पैसा मिळवून देणारं पीक जाणार
soyabean farmer Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 12:31 PM
Share

राज्यातील विविध भागात पावसाचा खंड पडला आहे. गेल्या महिनाभरापासून व्यवस्थित पाऊस पडलेला नाही. पाऊस न पडल्याने शेत जमीन तापू लागली आहे. या हवामानाने शेतकऱ्यांवर मोठं संकट निर्माण झालं आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. पाऊस पडत नसल्याने पैसा मिळवून देणारं सोयाबीन पीक हातातून जाणाच्या मार्गावर असल्याती भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा दुसरा कोणताही उपाय शेतकऱ्यांच्या हाती नसल्याचे समोर येत आहे.

अमरावतीत सोयाबीन पीक धोक्यात

एक महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने सोयाबीचं पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्यासारखं ऊन तापत असल्याने आणि जमिनीत ओलावा नसल्याने सोयाबीन पीक धोक्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत सोयाबीन शेंगा भरण्याचा कालावधी असतो. मात्र पाऊसच नसल्याने सोयाबीनची वाढ ही थांबली आहे. तसेच शेंगांचा भरणाही थांबला आहे. पुढील दोन-तीन दिवस पाऊस न आल्यास सोयाबीन पिके शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

लातूरमध्ये शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

पावसाअभावी सोयाबीन करपलं आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील पांढरवाडीत एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या पिकांत मेंढर चरायला सोडली आहेत. पावसाअभावी सोयाबीन हातून गेल्याने शेतकरी सतीश एरंडे यांनी आपल्या सोयाबीनच्या वावरात मेंढर सोडून दिली आहेत. पावसाअभावी रब्बी हंगाम बहुतांश शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे.

शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला ट्रक्टर

सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी संतप्त शेतकऱ्याने 5 एकरावरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गाव येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी जळणाऱ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. विकास खंडागळे या शेतकऱ्याने दोन महिन्यापूर्वी सोयाबीन पीक पेरण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च केला होता. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक शेती पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. दक्षिण सोलापुरात पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांना उडदाच्या पिकावर रोटर फिरवण्याची वेळ आली. दक्षिण सोलापुर तालुक्यातील संभाजी गाजरे या शेतकऱ्याने उडीद पिकावर रोटर फिरवला. पावसाअभावी तब्बल 5 एकर उडदावर शेतकऱ्याने वैतागून रोटर फिरवला. अवघ्या 65 दिवसात उडदाचे पिक येत असल्याने शेतकऱ्यांचा खरीपा उडीदाकडे कल असतो. मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील शेतकरीराजा हतबल झाल्याचे चित्र निर्माण झालं आहे.

Follow Us
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?