AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसच नाही, रात्रही उकाड्याची… पुरेपूर काळजी घ्या, पुढचे पाच दिवस… हवामान खात्याच्या इशाऱ्याने निघाला घामटा

Maharashtra Heatwave Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच रात्रीच्या तापमानातही वाढ होणार असल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दिवसच नाही, रात्रही उकाड्याची... पुरेपूर काळजी घ्या, पुढचे पाच दिवस... हवामान खात्याच्या इशाऱ्याने निघाला घामटा
Heat Wave Alert in MaharashtraImage Credit source: Google
| Updated on: May 19, 2026 | 4:47 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात बदल पहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, मात्र आता पुढील पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार यवतमाळचे तापमान वाढत चालले आहे आज पासून 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे . तसेच पुढचे पाच दिवस आणखी उष्णता वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वाढत्या उकाड्यामुळे लोक प्रचंड हैराण झाले आहे. गंभीर बाब म्हणजे दिवसासोबतच रात्रीचे तापमानही चिंताजनक वाढले असून सोमवारची रात्र यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण ठरली. रात्री 31.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

गोंदिया जिल्ह्याचे तापमान 44 अंशावर

गोंदिया जिल्ह्यात आज 44 अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. काल गोंदिया जिल्ह्याचे तापमान 42 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते तर आज तब्बल 2 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती, मात्र आज अचानक तापमान वाढल्याने गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. पुढील काही दिवसांमध्ये आणखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

अमरावती आणि वर्ध्यात पारा 46 अंशांवर

अमरावतीत जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. आजचे तापमान 46 अंशावर गेले आहे. त्यामुळे सकाळपासून अमरावतीत उन्हाचे चटके जाणवत आहेत. पुढील चार दिवस अशाच पद्धतीने तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर वर्ध्याचे तापमानही 46.5 अंश सेल्सिअसवर गेले आहे. कमाल सोबतच किमान तापमानातही वाढ झाली आहे. हवामान विभागाकडून तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

अकोल्यामध्ये उष्माघाताचा बळी?

अकोल्यामध्ये उष्माघाताचा बळी गेला आहे. अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीयेत. मात्र जास्त प्रमाणात ऊन लागल्याने नाकफुटी होत रक्तस्त्राव झाला असावा, म्हणून या व्यक्तीचा कदाचित उष्माघातामुळे मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अकोल्याचे तापमान 46.3 अंशांवर पोहोचले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 43.4 तापमानाची नोंद

गडचिरोली जिल्ह्यात 43.4 तापमानाची नोंद झाली असून गडचिरोलीला लागत असलेले विदर्भातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला लागून असलेला तेलंगणा राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ होत असून नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसत आहेत.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष