Maharashtra: Mumbai Rains LIVE, Monsoon Updates : राज्यात पावसामुळे पाचवी आणि आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

| Updated on: Jul 15, 2022 | 6:45 AM

Maharashtra Mumbai Rains LIVE Monsoon, IMD Updates in Marathi : राज्यात जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस बरसतोय. गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गडचिरोली दौऱ्यावर पोहोचले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 4- 5 दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह), मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाउस, मराठवाड्यातही पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे.

Maharashtra: Mumbai Rains LIVE, Monsoon Updates : राज्यात पावसामुळे पाचवी आणि आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
Maharashtra: Mumbai Rains LIVE, IMD Updates
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. तर नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर पोहोचलेत. तिथे असलेल्या पूरस्थितीचा आढावा ते घेत आहेत. तसंच संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचनाही त्यांनी केलाय. तिकडे नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर शहराला (Navapur City) पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. तर नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली असून, गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jul 2022 05:58 PM (IST)

    वसई तालुक्यात पर्यटन स्थळी जाण्यावर बंदी

    मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून 144 कलम केले लागू

    मान्सून काळात निसर्गाचा, तसेच धबधबे, तलाव, धरण, समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठयप्रमानात येतात.

    अतिवृष्टी मध्ये पर्यटकांची जीवित किंवा वित्त हानी होऊ नये यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय। परिमंडळ 2 चे पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील आजपासून पर्यटन स्थळ, धोकादायक परिसरावर केला मनाई आदेश जारी

    पर्यटन स्थळावर किंवा स्थळापासून 1 किलोमीटर अंतरा पर्यंत पर्यटकांना मनाई आदेश जारी केला आहे. या परिसरात फोउजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) हेही लागू केले आहे.

    – पर्यटन स्थळावर पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्याच्या उगमस्थान जाणे किंवा पोहणे, सेल्फी काढणे, नैसर्गिक पर्यटन किंवा धोकादायक ठिकाणी मद्यपान करणे, बाळगणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे किंवा चालवणे, या सहा अन्य काही बाबीनवर पोलिसांनी मनाई आदेश लागू केला आहे.

  • 14 Jul 2022 05:57 PM (IST)

    राज्यात पावसामुळे पाचवी आणि आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

    मुंबई- राज्यात 20 जुलैला राज्यभरात होणार होती परीक्षा मात्र आता पावसामुळे ती 31 जूलैला परीक्षा होणार. परीक्षेसाठी नवीन हॉलतिकीट काढण्याची गरज नाही ते ग्राह्य धरलं जाणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.


  • 14 Jul 2022 05:52 PM (IST)

    नांदेडमधील पूरस्थिती ओसरण्यास सुरुवात

    नांदेड: जिल्ह्यातील पूरस्थिती निवळण्यास सुरुवात, गोदावरी-पैनगंगा नद्यांचे पाणी हळूहळू होतेय कमी, अनेक रस्ते वाहतुकीसाठी पुन्हा खुले, सहा दिवसानंतर काही भागात सूर्यदर्शन, पासदगाव इथल्या आसना नदीत वाहून गेलेल्याचा अद्याप शोध लागेना.

  • 14 Jul 2022 05:51 PM (IST)

    मुंबई-अहमदाबाद हायवेवर पाणी, वाहतूक मंदावली

    मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर नवसारी आणि गुजरातच्या इतर भागात पाणी साचले आहे. लहान वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे वाहतूक अत्यंत मंदावली आहे. गुजरातकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गुजरातमध्ये महामार्ग मोकळा होईपर्यंत प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे किंवा त्यांना अडथळे येऊ शकतात. असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी केले आहे,

  • 14 Jul 2022 03:28 PM (IST)

    दरड कोसळली, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरच्या अंजनी-चिपळूण दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहेत. युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  पुढच्या अर्ध्या तासात रेल्वे ट्रॅक सुरळीत होणार असा दावा कोकण रेल्वेने केला आहे.

  • 14 Jul 2022 03:24 PM (IST)

    तेलंगणा राज्यातील दोन शेतकऱ्यांची पुरातून हेलिकॉप्टरद्वारे सुटका

    गडचिरोली- तेलंगणा-महाराष्ट्र सीमावर्ती भागात, तेलंगणा राज्यातील सोमनपल्ली येथे पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरने दोन नागरिकांना रेस्क्यू करण्यात आला जिल्ह्यात मेडीगट्टा धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे मोठा पुराचा फटका महाराष्ट् सीमावर्ती भागात व तेलंगणा सीमावर्ती भागाला बसलेला आहे. गंभीर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाली असून या या पुराचा फटका तेलंगणा राज्यातील चन्नुर सोमनपल्ली या गावालाही बसला होता.  नगरम येथील हनुमान मंदिरही पुराच्या पाण्याने वेढले आहे.

  • 14 Jul 2022 03:13 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ

    कोल्हापूर – गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ होतेय. कोल्हापुरातील प्रयाग संगम या ठिकाणी कुंभी,कासारी, भोगावती या नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा नदी प्रवाहित होते. या संगमाच्या ठिकाणी सध्या पाण्याचं विस्तीर्ण रूप पाहायला मिळतय. संगमावर असलेलं दत्त मंदिरदेखील आता पूर्णपणे पाण्याखाली गेलं असून मुख्य पुलाबरोबर पाण्याचा प्रवाह सुरू आहे.  प्रयाग संगमाच्या ठिकाणी वाढत असलेल्या पाण्याची पाहणी आज एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.

  • 14 Jul 2022 03:09 PM (IST)

    तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता

    पालघर – तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. तेव्हा 2 ते 3 दरवाजे उघडे करून 93.78 क्युसेक्स पर्यंत विसर्ग होउ शकतो.  त्यामुळे तानसा नदीकाठच्या 33 गावांना इशारा देण्यात आला आहे

  • 14 Jul 2022 03:07 PM (IST)

    चंद्रपूर-  पुरात अडकलेल्या २२ ट्रक ड्रायव्हरांचा वाचला जीव

    चंद्रपूर-  पुरात अडकलेल्या २२ ट्रक ड्रायव्हरना वाचवण्यात आले आहे.  घुग्गुस-भोयेगाव मार्गावर आज पहाटे करण्यात रेस्क्यू करण्यात आले आहे. भोयेगाव पुलावर पाणी असल्यामुळे या ठिकाणी ट्रक थांबले होते. मात्र काल रात्री अचानक वर्धा नदीचे पाणी वाढल्याने थांबलेल्या ट्रकच्या मागच्या बाजूने देखील पुराचा वेढा पडला होता.  पोलीस विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीमने सर्व ट्रकचालकांना बोटीच्या मदतीने काढले बाहेर

  • 14 Jul 2022 02:48 PM (IST)

    पुणे – भोर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भातशेती गेली वाहून

    पुणे- जिल्ह्यातील भोर तालुक्यात पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. भातशेती पाण्यात वाहून गेली आहे.  भाताच्या खाचरातील मातीही  वाहून गेली आहे. शेकडो हेक्टरवर भात शेतीचं नुकसान झालं आहे.

     

  • 14 Jul 2022 02:27 PM (IST)

    विदर्भात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

    विदर्भातील बहुतांश भागात उद्या येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.  गडचिरोलीत ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  यंत्रणेला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  हवामान विभागाने नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय, तर गडचीरोली जिल्ह्यात ॲारेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत विदर्भातील बहुतांश  भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. त्यानंतर पुढील पाच दिवस विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.

  • 14 Jul 2022 02:16 PM (IST)

    नांदेड- पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ 50 हजारांची मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी

    नांदेडमध्ये गेल्या सहा दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेय. नदी नाल्याना आलेल्या पुरामुळे शेत जमिनीचे प्रचंड असे नुकसान झालेय. आज सकाळ पासून पाऊस ओसरला असला तरी पुराचे पाणी अद्यापही शेतात साचूनच आहे. आता शेतात पंचनामा करायला काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे नांदेडमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

  • 14 Jul 2022 02:14 PM (IST)

    वसईच्या तानसा नदीला पूर, अनेक घरांत पाणी, काही गावांचा संपर्क तुटला

    विरार :- वसईच्या तानसा नदीला पूर आला आहे. नदीचे पात्र दुतर्फा भरून वाहत असून आजूबाजूच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या आजुबाजुला एक किलोमीटरपर्यंत पाणीच पाणी झाले असून, अनेक घरांतही पाणी गेले आहे.भाताने, नवसई , मेढा , चिमणे , खनिवाडे, हेदवडे , काशीद कोपर, आडाने , पारोळ, आंबोडे , शिरवली , घाटघर थाळ्याचा पाडा , जांभूळ पाडा या गावांचा संपर्क तुटला आहे.  जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत 15 ते 20 किलोमीटर चा वळसा घालून गावांना संपर्क करावा लागत आहे.

  • 14 Jul 2022 02:11 PM (IST)

    हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची रिप -रिप सुरू असल्याने नदी नाले ओसंडून वाहत असल्याने हजारो हेक्टर वरील शेतातील कोवळी पिके पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले आहेत , घरांचीही पडझड झालेली आहे.  शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूले वाहून गेल्याने अनेक गावांचा शहराशी संपर्क होत नाहीये.

  • 14 Jul 2022 02:07 PM (IST)

    रत्नागिरी-मुंबई मार्गावरील परशुराम घाट 10 दिवसांनी सुरु

    रत्नागिरी- मुंबई-गोवा मार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.  10 दिवसानंतर परशुराम घाट सुरू झालाय.  दरडी कोसळत असल्याने अवजड वाहतुकीसाठी घाट बंद केला होता.
  • 14 Jul 2022 02:05 PM (IST)

    जळगाव- गिरणा धरण 80 टक्के भरले, कधीही धरणातून विसर्ग सुरु होणार

    जळगाव – संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या धरणावर अवलंबून आहे ते गिरणा धरण 80 टक्के भरले असून कुठल्याही क्षणी गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे.

  • 14 Jul 2022 02:03 PM (IST)

    अमरावतीत गांधी चौकात इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

    अमरावती: अमरावती जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरांची पडझळ होत आहेत. अशातच अमरावतीमध्येही एक इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. अमरावतीच्या गांधी चौक ते राजापेठ चौक रस्त्यादरम्यान असलेल्या कन्हैया दूध डेरी व एक इलेक्ट्रॉनिक दुकान असलेली दोन मजली इमारत दुपारी एक वाजता च्या सुमारास इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळणार याची शक्यता वाटल्याने  व्यावसायिक दुकानाबाहेर पडले होते त्यानंतर दहा मिनिटातच इमारत पत्त्यासारखी कोसळली. कोसळलेली इमारत ही 35-40 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळाली आहे. इमारत कोसळतात पोलीस प्रशासन व महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून, सध्या जेसीबीद्वारे रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.

  • 14 Jul 2022 01:48 PM (IST)

    nashik rain update : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट

    नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सायखेडा येथील नदीकाठचे स्थलांतरित नागरी घराकडे येण्यास सुरुवात झाले आहे मात्र चिखल आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई उद्भवण्याच्या भीतीमुळे चिंताग्रस्त झाले

  • 14 Jul 2022 01:47 PM (IST)

    maharashtra rain live update : दक्षिण गडचिरोली असलेल्या सिरोंचा अहेरी एटापल्ली भामरागड मुलचेरा या पाच तालुक्यात पच्चवीस आरोग्य पथके तैनात

    गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त असलेल्या 129 गावांमधून 187 गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास जिल्हा आरोग्य यंत्रणेने बोलावली तात्काळ बैठक

    जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातून 17 गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले त्यातून एक गर्भवती महिलेची प्रसूती पण झाली बाळ माता सुरक्षित आहेत

    सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली सोमनुर या गावातून तीन गर्भवती महिलांना जीवाची बाजी लावून काल सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने हलविले

    दक्षिण गडचिरोली असलेल्या सिरोंचा अहेरी एटापल्ली भामरागड मुलचेरा या पाच तालुक्यात पच्चवीस आरोग्य पथके तैनात

    आरोग्य विभागाची तात्काळ बैठक सुरू असताना आढावा घेतला आमचा प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी

  • 14 Jul 2022 01:45 PM (IST)

    Kokan rain live update : कोकणात भातशेतीसह इतर शेती उत्पादनांच्या कामांना सुरुवात

    कोकणात भातशेतीसह इतर शेती उत्पादनांच्या कामांना सुरुवात होते. गावोगावच्या शेतात शेतकरी कधी एकटा तर कधी सहकुटुंब, शेजारपाजा-यांसह राबताना दिसतो. या भूमिपुत्रांसोबत अनेकदा नेहमीच्या वापरातील कपडय़ांसहित चिखलात बिनधास्त वावरणारे युवक-युवतीही दृष्टीस पडतात. साहजिकच पाहणा-यांची नजर वळते आणि ज्यांना हे माहीतच नसते, त्यांना कुतूहल निर्माण होते.

  • 14 Jul 2022 01:43 PM (IST)

    maharashtra rain live update : दहा जणांची एनडीआरएफने केली सुटका

  • 14 Jul 2022 01:31 PM (IST)

    Maharashtra rain live update : कुकडी प्रकल्पांतर्ग असलेल्या पाच धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील 24 तासात मोठी वाढ

    कुकडी प्रकल्पांतर्ग असलेल्या पाच धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील 24 तासात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्पांतर्गत  असलेल्या वडज धरण लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने  मीना नदीला पूर आलाय. वडज धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मीना नदीपत्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या नारायणगाव, खोडद आदि गावच्या लोकवस्तीला धोक्याचा इशारा देण्यात आलाय. धरणात सुमारे 50 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.त्यामुळे काळजी घेण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे.

  • 14 Jul 2022 01:09 PM (IST)

    Pune rain live update : सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना

    सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना
    आज सकाळी घाट रस्त्यावर एका वळणावर कोसळली दरड
    सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड आज सकाळी कोसळली
    सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वाहतूक सुरु नव्हती
    कुठलीही हानी नाही
    अतिवृषटीमुळे सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे
  • 14 Jul 2022 01:08 PM (IST)

    Kolhapur Vishalgad Live Update : कोल्हापुरातील विशाळगडाचा दगडी बुरुज ढासळला

    कोल्हापुरातील विशाळगडाचा दगडी बुरुज ढासळला

    लोखंडी जिन्याच्या बाजूच्या बुरुजाचा काही भाग कोसळला

    बुरुज ढासळल्याने लोखंडी जिना वाहतुकीसाठी बंद

  • 14 Jul 2022 12:58 PM (IST)

    maharashtra rain live update : पावसामुळे कल्याण एपीएमसी मार्केट मध्ये भाज्यांची आवक घटली

    नगर पुणे नाशिक जिल्ह्यात अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला आहे .त्यामुळे शेतीचे नुकसान झालंय याचा परिणाम कल्याण एपीएमसी मार्केट मध्ये पाहायला मिळत आहे, पाले भाज्या व फळभाज्यांची आवक घटली आहे .कल्याण एपीएमसी मार्केट मध्ये दरदिवस २५० ते ३०० गाड्यांची आवक होते. मात्र पावसामुळे १५० गाड्यांची आवक होतेय .आवक घटल्याने भाज्यांचे भाव कडाडले असून दुप्पटीने वाढले आहेत पुणे, नाशिक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून देखील भाज्याची आवक होते गुजरात मध्ये देखील काही जिल्ह्यात पूर परिस्थिती आहे याचा परिणाम कल्याण च्या कृषी उत्पन्न बाजार समिती ला बसला आहे .त्यामुळे काही दिवस तरी नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
  • 14 Jul 2022 12:52 PM (IST)

    Gujrat rain live update : मुंबई अहमदाबाद महामार्गावर ओलीपोर वलसाड येथे वाहतूक करण्यात आली बंद

    1. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ओलीपोर वलसाड येथे वाहतूक करण्यात आली बंद ,
    2. मुसळधार पावसाने पूर्णा नदीचे राष्ट्रीय महामार्ग आल्याने महामार्ग बंद करण्यात येत असल्याचे नवसारी जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
    3. मुंबई अहमदाबाद वरील गुजरात आणि मुंबई कडे येणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत, वाहनाचा वलासाड येथे लागल्या वाहनाचा रांगा .
  • 14 Jul 2022 12:49 PM (IST)

    Chandrapur Rain Live Update : चंद्रपूर तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन बाप शिरला पुराच्या पाण्यात

    1. चंद्रपूर तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन बाप शिरला पुरात..
    2. मुलगा तापाने फणफणत होता.गावात आरोग्य सूविधा नाही.नदी,नाल्यांना पुर.मात्र बाप तो बापच.मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला.
    3. पुराततून पायी मार्ग काढीत मुलावर उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला.या जिगरबाज बापाचे नाव आहे, श्यामराव पत्रूजी गिनघरे.तो गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहीवासी आहे.
  • 14 Jul 2022 12:47 PM (IST)

    Mahabaleshwar Rain Live Update : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या  दिवसापासुन पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले

    महाबळेश्वर तालुक्यात गेल्या  दिवसापासुन पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे..मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले होते.. याच पाश्वभुमीवर सतर्कतेचा बाब म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोजांरी यांनी आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी आज सकाळी 11 ते 5 यावेळेत बंद ठेवला आहे

  • 14 Jul 2022 12:44 PM (IST)

    Pune Rain Live Update : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणारं नीरा नदीवरील नेकलेस पॉईंटचं विहंगम दृश्य

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणारं नीरा नदीवरील नेकलेस पॉईंटचं विहंगम दृश्य

    पडणाऱ्या पावसानं नदीला आलं पाणी

    भोर तालुक्यात पडलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान

    नेकलेस पॉईंटचं हे विहंगम दृश्य पाहा आकाशातून !

    टीव्ही 9मराठीनं ड्रोन मधून घेतला आढावा !

  • 14 Jul 2022 11:45 AM (IST)

    vasai virar rain live update : वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला

    वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी साचनण्यास सुरुवात झाली आहे.
    हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पालघर जिल्ह्याला आज दिवसभर रेड अलर्ट जाहीर केला आहे.
    आज वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कॉलेज ला सुट्टी जाहीर केली आहे.

    दिवसभरात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
    आज ११ वाजताची वसई पंचवटी नाक्यावरील ही दृश्य आहेत

  • 14 Jul 2022 11:44 AM (IST)

    Pune Rain Live Update : दत्त मंदिरासमोरील वाड्याची भिंत शेजारच्या घरावर कोसळली

    – शहरातील कोंढवा बुद्रुक गावठाण येथील दत्त मंदिरासमोरील वाड्याची भिंत शेजारच्या घरावर कोसळली. अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद देत वाड्याशेजारील तीन घरातून ११ रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • 14 Jul 2022 11:43 AM (IST)

    Aurangabad Rain Live Update : औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील सीतान आणि धबधबा प्रवाहित

    औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील सीतान आणि धबधबा प्रवाहित झाला आहे औरंगाबाद जिल्ह्यात जोरात पाऊस झाल्यामुळे या धबधब्याला पाणी आलेला आहे त्यामुळे वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर पडली आहे तब्बल 200 फूट उंचावरून सीता नानीचा धबधबा सध्या कोसळू लागला आहे त्यामुळे पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण बनला आहे

  • 14 Jul 2022 11:18 AM (IST)

    Palghat Rain Live Update : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात  मुसळधार पाऊस

    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात  मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे  मोडकसागर धरणातून  224.03 cumecs पाण्याचा विसर्ग होत मुंबई महानगरपालिका यांनी या अगोदरच पालघर व ठाणे जिल्ह्यातील नदीकाठच्या 42 गावांना इशारा दिला आहे

  • 14 Jul 2022 11:13 AM (IST)

    Navi Mumbai Rain Live Update : नवी मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात

    नवी मुंबईत सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता बरसायला सुरुवात केली आहे

    जुईनगर, बेलापूर, वाशी या ठिकाणी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे

  • 14 Jul 2022 10:29 AM (IST)

    Koyana River Update : कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ, कराडच्या प्रिती संगमावर नदीची पाणी पातळी वाढली

    कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ

    कराडच्या प्रितीसंगमावर नदीची पाणी पातळी वाढली

    धरणातुन सोडलेले पाणी व पडत असलेला पाउस यामुळे पाणी पातळीत वाठ

  • 14 Jul 2022 10:20 AM (IST)

    Khadakwasla Dam : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पाऊस झाला कमी

    मध्यरात्रीनंतर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पावसाचा काहीसा कमी झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय….सकाळी सहा वाजल्यापासून धरणातून 10 हजार 246 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय… त्यामुळं भिडे पुलावरचे पाणी ओसरले आहे….. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आलाय

  • 14 Jul 2022 09:52 AM (IST)

    Vasai Rain Update : वसई विरार मध्ये जोरदार पाऊस सुरू

    विरार:- वसई विरार मध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे..

    सकाळी 9.30 पासून पावसाला सुरवात झाली असून, वाऱ्या सह जोरदार पाऊस पडत आहे..

    आज दिवसभर पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे..

    आभाळ पूर्णपणे भरलेले असून दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे..

  • 14 Jul 2022 09:51 AM (IST)

    Nashik Rain Update : नाशिक शहराला जोडणारा रामसेतू पूल ‘रामभरोसे’

    नाशिक – शहराला जोडणारा रामसेतू पूल ‘रामभरोसे’

    रामसेतू पुलावर पुराच्या पाण्यामुळे मोठे खड्डे

    तीन वर्षांपासून पुलाची ना दुरुस्ती, ना डागडुजी

    धोकादायक रामसेतू पुलावरून नागरिकांची ये – जा सुरूच

    पूल कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती..

    रामसेतू पुलाच्या तात्काळ दुरुस्तीची रहिवाशांची मागणी

  • 14 Jul 2022 09:50 AM (IST)

    Amravati Rain Update : अमरावतीच्या अप्पर वर्धा धरनाचे 7 दरवाजे उघडताच धरणावर पर्यटक येण्यास सुरवात

    अमरावतीच्या अप्पर वर्धा धरनाचे 7 दरवाजे उघडताच धरणावर पर्यटक येण्यास सुरवात…

    अमरावती: मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांनाही पूर आला आहे .सोबतच अप्पर वर्धा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण 75 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे 13 पैकी सात दरवाजे उघडले आहे. दरम्यान दरवाजे उघडल्याची माहिती मिळतात पर्यटकांची पावले आता अपर वर्धा धरणाकडे वळू लागले आहे..

  • 14 Jul 2022 09:34 AM (IST)

    kokan rain update : अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड केली बाजूला

    अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड केली बाजूला

    अणुस्कूरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू

    बांधकाम विभागाच्या प्रयत्नानंतर पडलेली दरड केली बाजूला

    राजापूर मार्गे कोल्हापूरला जोडणारा हा घाट

    मुसळधार पावसाचा परिणाम कोकणातील घाट रस्त्याला देखील

  • 14 Jul 2022 08:54 AM (IST)

    Palghar Rain Update : पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल

    पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 14/07/2022 (8 am to 8pm)
    1)वसई:- 80मी मी
    2)जव्हार:- 237.66मी मी
    3) विक्रमगड:- 296.50मी मी
    4) मोखाडा:- 154.50मी मी
    5) वाडा :- 267.75मी मी
    6)डहाणू :- 232.66मी मी
    7) पालघर:- 220मी मी
    8) तलासरी :- 290.15मी मी
    एकूण पाऊस :- 1779.22मी मी
    एकुण सरासरी :- 222.40 मी मी

  • 14 Jul 2022 08:47 AM (IST)

    Mumbai Rain Update : मुंबईतल्या पावसाची अपडेट एका क्लिकवर

  • 14 Jul 2022 08:43 AM (IST)

    Khadakwasla Dam Rain Update : खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती, धरणात परिसरात 54 मिमी पावसाची नोंद

    खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती

    खडकवासला धरणातून नदी पात्रता करण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केला कमी

    सध्या धरणातून 4 हजार 807 पाण्याचा विसर्ग सुरु

    खडकवासला धरणात 54 मिमी पावसाची नोंद

  • 14 Jul 2022 08:39 AM (IST)

    Gadciroli Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील सोमनुर व सोमनपल्ली या दोन गावात तीन गर्भवती महिला पुरात अडकलेल्या होत्या

    1. गडचिरोली जिल्ह्यातील सोमनुर व सोमनपल्ली या दोन गावात तीन गर्भवती महिला पुरात अडकलेल्या होत्या
    2. सिरोंचा येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी Sdrf यांच्या साहाय्याने या तीन गर्भवती महिलांना पुरातून  सुरक्षित बाहेर काढले
    3. इंद्रावती नदीला पूर आल्याने महाराष्ट्रातील टोका वरती भाग सोमनपल्ली सोमनुर या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती
  • 14 Jul 2022 08:28 AM (IST)

    Maval Rain Update : मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 50.97 टक्के पाणीसाठा

    मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 50.97% टक्के पाणीसाठा

    -गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली

    -24 तासात धरण परीक्षेत्रात 144 मिलिमीटर पाऊस पडलाय त्यामुळे तब्बल अवघ्या 12 तासात 7.30% टक्के इतका पाणीसाठ्यात वाढ झाली, यामुळं पाणी कपातीच संकट दूर झालं

    -असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास जुलै च्या शेवटच्या आठवड्यात धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.

  • 14 Jul 2022 08:21 AM (IST)

    Chadrapur Rain Update : चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरले इरई नदीचे पाणी

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरले इरई नदीचे पाणी…

    रहमत नगर, राजनगर आणि सहारा पार्क या भागातल्या अनेक घरांमध्ये इरई नदीच्या पाण्याचा शिरकाव,

    महानगरपालिकेच्या पथकाने रहमतनगर परिसरातून 15 ते 20 लोकांना हलविले सुरक्षित स्थळी,

    इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दरवाजे अजूनही 1 मीटरने सुरू असल्याने नदीच्या पाणी पातळीत होत आहे सातत्याने वाढ

  • 14 Jul 2022 08:20 AM (IST)

    Koyana Dam Update : कोयना धरणात 43.18 tmc पाणीसाठा झाला

    कोयना धरणात 43.18 tmc पाणीसाठा झाला

    धरणात 55182 कयुसेक पाणी आवक सुरु

    कोयना नदीपात्रात 1050 कयुसेक पाणी विसर्ग

    धरण पाणलोट क्षेत्रात
    कोयनानगर 112 मिलिमीटर
    नवजा 121 मिलीमिटर
    महाबलेश्वर 270 मिलीमीटर
    पाऊसाची नोंद झाली

  • 14 Jul 2022 08:19 AM (IST)

    Vidharbh Rain Update : विदर्भात पावसाची विक्रमी हजेरी

    विदर्भात पावसाची विक्रमी हजेरी

    आठवडाभरात जून -जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नोंद

    अजूनही पावसाचा इशारा असल्याने परिस्थिती आणखी वाईट होणार का ?.

    विदर्भात 13 जुलै पर्यंत सरासरी 299 मिमी पावसाची नोंद होते मात्र यावेळी तब्बल 405 मिमी पावसाची झाली नोंद

  • 14 Jul 2022 07:43 AM (IST)

    Washin Rain Update : वाशिम जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरूच

    वाशिम जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरूच….

    जिल्ह्यातील सर्वात मोठे मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी…

    सोनल प्रकल्प – 448.90 मीटर

    एकबुर्जी प्रकल्प -144.50 मीटर

    अडाण प्रकल्प – 376.85 मीटर

    जलसाठा द.ल.घ.मी.मध्ये

    सोनल प्रकल्प – 7.25

    एकबुर्जी प्रकल्प – 0.95

    अडाण प्रकल्प – 21.17

  • 14 Jul 2022 07:38 AM (IST)

    Gadchiroli Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडलेले आहे

    गडचिरोली- महाराष्ट्राचा टोकावर गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सुरू असून राज्यातून सर्वात जास्त विसर्ग या धरणातून सध्या होत आहे

    १९ लाख ६६ हजार ०९० क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणातुन होत आहे

    राज्यात सर्वात जास्त विसर्ग होणारा धरण

    या मेड्डीगट्टा लक्ष्मी धरणांमुळे गोदावरी प्राणहिता नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली

    गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडलेले आहे

    काल सिरोंचा तालुक्यातील अकरा गावांना रेड अलर्ट करण्यात आला होता तिथून पहाटे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

    जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आव्हान केला आहे की सुरक्षित ठिकाणी रहावे पूरपरिस्थिती निर्माण असलेल्या रस्त्यावरून प्रवास करू नये

    गडचिरोली जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आसावा दिवसभर पाऊस रिमझिम असला तरी पूर परिस्थिती कायमच

    Wkt& जिल्हाधिकारी आवाहन केलेले बाईट विजलव मेडीगट्टा धरणाचे

  • 14 Jul 2022 07:35 AM (IST)

    Buldhana Rain Update : बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे धरण 55 टक्के भरले, शहराच्या आठ महिन्याच्या पाण्याची चिंता मिटली

    बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे धरण 55 टक्के भरले, शहराच्या आठ महिन्याच्या पाण्याची चिंता मिटली…
    गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुलडाणा शहर आणि 13 खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पानी पातळीत वाढ होऊन  येळगाव धरण 55% भरलेय … त्यामुळे बुलढाणेकर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय..  धरणं 55% भरल्याने  आता पाण्याची आठ महिन्यांची चिंताही मिटली आहे… तर पाऊस अजूनही सुरूच असून येत्या काही दिवसात धरणात आणखी पानी पातळी वाढण्याची शक्यता आहे ..  तसेच नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे , की पाण्याचा अपव्यय टाळावा,  नळाचे  कॉक बंद करून ठेवावे,  जेणेकरून दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही..  धरणांमध्ये सध्याच्या घडीला 55 टक्के पाणीसाठा आहे.
  • 14 Jul 2022 07:33 AM (IST)

    Mahableshwar Rain Update : अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले

    महाबळेश्वर तालुक्यात गेल्या 4 दिवसापासुन पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे..मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले होते.. याच पाश्वभुमीवर सतर्कतेचा बाब म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोजांरी यांनी आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी आज सकाळी 11 ते 5 यावेळेत बंद करण्याचे पत्र महाबळेश्वर तहसिलदार यांना दिले असल्याची माहीती उप अभियंता महेश गोजांरी यांनी दिलीये .

  • 14 Jul 2022 07:32 AM (IST)

    Bhandara Rain update : नरसिह मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त गेल्याने तेथेच अड़कुन पडलेल्या 15  भाविकाना अखेर 19 तासांचा अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले

    भंडारा जिल्हातिल मोहाडी तालुक्यातिल माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात असलेले नरसिह मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त गेल्याने तेथेच अड़कुन पडलेल्या 15  भाविकाना अखेर 19 तासांचा अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे।यात 7 स्त्रिया व 8 पुरुषाचा समावेश आहे।विशेष म्हणजे राज्य आपत्ति दलामार्फत रेस्क्यू दला मार्फत काल पासून रेस्क्यू करण्याचे काम सुरु होते।मात्र पाण्याचा प्रवाह अधिक जास्त असल्याने त्यांना बाहेर काढ़ने धोक्याचे ओळखून आज अखेर सकाळी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आहे।

  • 14 Jul 2022 07:30 AM (IST)

    Vaitarana River Update : वैतरणा नदीच्या पाण्यात अडकलेल्या बार्ज मधील तेरा कामगारा पैकी 6 कामगारांना सुखरूप बाहेर काढले

    पालघर मधील वैतरणा नदीच्या पाण्यात अडकलेल्या बार्ज मधील तेरा कामगारा पैकी 6 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात NDRF च्या टीम ला आले यश आहे. 13 पैकी 6 जणांना NDRF टीम ने बोटी च्या साह्याने बाहेर काढले आहे. इतर साथजणांना बाहेर काढण्याचा बचाव कार्य सुरू आहे.

  • 14 Jul 2022 07:28 AM (IST)

    Nashik Rain Update : धरण पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस सुरूच असल्याने पाण्याची पातळी वाढली

    नाशिक – जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच..

    धरण पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस सुरूच असल्याने पाण्याची पातळी वाढली

    गंगापूर धरणातून आज देखील पाण्याचा विसर्ग सुरुच राहणार

    गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे ड्रोन च्या माध्यमातून घेतलेले हे exclusive दृश्य फक्त TV9 च्या दर्शकांसाठी (सौजन्य म्हेह बडाख)

  • 14 Jul 2022 07:27 AM (IST)

    Pachaganga River Update : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

    कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उसंत

    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ मात्र कायम

    नदीची पाणी पातळी पोहोचली 36 फूट दहा इंचावर

    जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली

    पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्यासाठी अवघे दोन फूट बाकी

    नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

  • 14 Jul 2022 07:24 AM (IST)

    Nagpur Rain Update : अवैध माती उत्खनन केल्याने पावसात शेजारच्या शेतकऱ्यांची जमिन खचलीय

    – नागपूर जिल्ह्यांच्या कामठी तालुक्यातील आडका गावात अवैध माती उत्खनन

    – रेल्वे कंत्राटदाराने केलेल्या अवैध माती उत्खननाचा शेतकऱ्यांना फटका

    – नागपूर – नागभीड रेल्वे ब्रॅाडगेज कामासाठी केलं मातीचं अवैध उत्खनन

    – अवैध माती उत्खनन करुन केले १५ ते २० फुटाचा खड्डा

    – अवैध माती उत्खनन केल्याने पावसात शेजारच्या शेतकऱ्यांची जमिन खचलीय

    – शेजारच्या शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान

    – महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका

    – कामठी तहसीलदार कारवाई का करत नाही? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

  • 14 Jul 2022 07:24 AM (IST)

    Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त

    पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त

    दौंड, इंदापूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे आणि हवेली हे तालुके टँकर मुक्त

    शिवाय जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या एकूण टॅंकरची संख्या पूर्वीपेक्षा निम्म्याहून कमी झाली

    मात्र भर पावसाळ्यातही जिल्ह्यातील शिरूर तालुका अद्यापही तहानलेलाच

    या तालुक्यात सर्वाधिक 15 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

    सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 22 गावे आणि 192 वाड्यांना 29 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु

  • 14 Jul 2022 07:23 AM (IST)

    Dhule Rain Update : धुळे शहरात रात्रभर भर पावसाची रिप रिप सुरु

    धुळे शहरात रात्रभर भर पावसाची रिप रिप सुरु…सकाळ पासून वातावर कोरडे…पाऊस नसल्याने शेती च्या कामना वेग..

  • 14 Jul 2022 06:58 AM (IST)

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 45 सेमी ने उघडले

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 45 सेमी ने उघडले….

    धरणाच्या 7 दरवाज्यातुन वर्धा नदीपात्रात 500 क्युमेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे…

    अप्पर वर्धा धरण 75 टक्के भरले;धरण क्षेत्रात रात्रीपासून सुरू आहे पावसाची दमदार बॅटिंग….

    अमरावती, वर्धा,यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा…

  • 14 Jul 2022 06:46 AM (IST)

    Ratnagiri Rain Update : डोंगराला मोठ्या भेगा गेल्यामुळे गावकरी चिंतेत

    चिपळूण मधील कळकवणे मध्ये एनडवाडीतल्या वस्तीच्या मागील डोंगराला पडल्या 4 फुटापर्यंत भेगा पडल्या आहेत

    कळकवणे मधील ग्रामस्थ धास्तावले आहेत  भाषयभीत झाले आहेत

    एनडवाडीतल्या ग्रामस्थांचे प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे

    डोंगराला मोठ्या भेगा गेल्यामुळे गावकरी चिंतेत होते

  • 14 Jul 2022 06:45 AM (IST)

    Solapur Rain Update : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरुच

    – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरुच

    – मागील तीन दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा

    – तर संततधार पावसामुळे शहरी भागातील छोट्या व्यवसायिक, कामगारांच्या रोजगाराला ब्रेक

    – संततधार पावसामुळे शहरातील नागरिक हैराण

    – सोलापूर जिल्ह्यात कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी नाही.

  • 14 Jul 2022 06:39 AM (IST)

    Nanded Rain Update : नांदेडमध्ये सर्वदूर संततधार पाऊस

    नांदेड: काल सांयकाळी थोडीशी विश्रांती घेतलेला पाऊस मध्यरात्रीपासून पुन्हा सक्रिय, मध्यरात्रीपासून नांदेडमध्ये सर्वदूर संततधार पाऊस, पावसाच्या थैमानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दैना, अजूनही अनेक गावांचा संपर्क तुटलेलाच, असंख्य रस्ते पाण्याखाली तर अनेक गावांना पुराचा विळखा कायम.

  • 14 Jul 2022 06:36 AM (IST)

    Latur Rain Update : उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणारा बनशेळकी तलाव ओव्हरफ्लो

    लातुर–उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणारा बनशेळकी तलाव ओव्हरफ्लो, प्रशासनाने केली पाहणी.

  • 14 Jul 2022 06:35 AM (IST)

    Khadakwasla Dam Rain Update : खडकवासला धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे

    खडकवासला धरण धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 13138 क्युसेक विसर्ग कमी करून ठीक स. 6.00 वा. 4708 क्युसेक करण्यात येत आहे.

    तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी…

  • 13 Jul 2022 11:03 PM (IST)

    हातनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले

    हातनूर धरणातून 125156 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. हातनूरचे असलेले पूर्ण 41 दरवाजे यावर्षी पहिल्यांदा उघडले आहेत. तापी नदी मध्यप्रदेशातून तर पूर्णा नदी विदर्भातून येत असल्याने हातनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे.

  • 13 Jul 2022 10:51 PM (IST)

    Mumbai Rain : वसई दरड दुर्घटना: मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 6 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    मुंबई : वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 10:46 PM (IST)

    Rain Update : धरणाचे आणखी दरवाजे उघडणार

    ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे आज रात्री 11 वाजता धरणाचे 5 दरवाजे 20 सेमीने उघडण्यात येणार असून 160 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येणार आहे .

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 10:38 PM (IST)

    गडचिरोलीतील शाळाही तीन दिवस बंद राहणार

    गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती पाहता 16 तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालय सर्व बंद राहतील. असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. पहिले 11 तारखे पासून 13 जुलैपर्यंत शाळा बंद  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता या तीन दिवसाची वाढ जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाच्या फटका बसल्याने अनेक नद्या व नाले पूर परिस्थितीत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 10:30 PM (IST)

    उदगीर ते लातूर वाहतूक शिरूर-अनंतपाळ मार्गे वळवली

    उदगीर ते लातूर वाहतूक शिरूर-अनंतपाळ मार्गे वळवली आहे, नळेगाव जवळच्या चामरगा-पाटीजवळ रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने उदगीर-लातूर मार्गावरची वाहतूक झाली ठप्प झाली, रस्त्याचे काम सुरू असल्याने पुलाचे करण्यात आले आहे. खोदकामात ओढ्याचे पाणी घुसल्याने वाहतुकीचा खोळंबा झालाय.. लातूरहून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनांनी आणि उदगीरहून लातूरकडे येणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यात आलंय.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 10:24 PM (IST)

    Mumbai Rain Update : ठाण्यातील शाळाही उद्या बंद राहणार

    ठाणे जिल्ह्यातील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळांना दि. 14 आणि 15 जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुट्टी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 09:55 PM (IST)

    Yavatmal Rain : शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो

    यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे यवतमाळकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे, सलग मुसळधार पावसामुळे निळोणा धरण ओव्हरफ्लो झालं आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 09:53 PM (IST)

    Gondia Rain : 4 मुलं नाल्याच्या प्रवाहात बेपत्ता

    -गोंदिया शहरातीलल 4 मुलं नाल्याच्या प्रवाहात बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चार मुलांचा सध्या शोध सुरू आहे. आता जिल्हा प्रसाशनाच्यावतीने सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 09:17 PM (IST)

    Rain Update : पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज-मुख्यमंत्री

    पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिलेत. राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विट

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 09:04 PM (IST)

    Pune Rain : पुलावरून जात असताना वाहून गेलेली व्यक्ती सुखरूप

    जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील पुलावरून जात असताना वाहून गेलेली व्यक्ती सुखरूप वाचली आहे. एकनाथ बबन रेंगडे असे या घटनेत बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने व्यक्तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.  पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 08:51 PM (IST)

    Rain Update : नवापूर शहरासह तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात

    शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच रंगावलीसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ईस्लामपूर भागात एका घरात पाणी शिरले आहे. तसेच कॉलन्यामधील रस्ते देखील जलमय झाले आहेत.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 08:44 PM (IST)

    Rain Update : गोसेखुर्द धरणातून मध्यरात्री 12 हजार क्यूसेक्स जलविसर्ग करणार

    चंद्रपूर:-गोसेखुर्द धरणातून मध्यरात्री 12 हजार क्यूसेक्स जलविसर्ग करणार, जलसंपदा विभागाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला माहिती ही दिली , धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने विसर्ग वाढवणार आहेत., चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-मूल- सावली- पोंभुर्णा- गोंडपिपरी या तालुक्यातून वाहणा-या नदीकाठच्या गावाना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे, चंद्रपूर शहरालगत असलेल्या इरई धरणातून सध्या महत्तम विसर्ग केला जातोय, त्यामुळे इरई-वर्धा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन चंद्रपूर शहराच्या सखल भागात पूर पूरस्थिती आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 08:07 PM (IST)

    Gadchiroli Rain Update : गडचिरोलीत पावसाचा कहर सुरू

    गडचिरोली -सोमनपल्ली येथे गर्भवती महिला पुरात अडकल्याने तिला व काही नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तहसीलदारांनी स्वतः एस.डी.आर.एफ पथकासोबत जाऊन त्यांना पुरातून बाहेर काढलं आहे. महाराष्ट्राचे शेवटच्या टोकाला छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली या गावात इंद्रावती नदीच्या पाण्यानी अचानक पूर परिस्थिती निर्माण केली. सिरोंचा येथील तहसीलदार जितेंद्र शिरतोडे हे स्वतः बचाव कार्यात उतरले आहेत.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:37 PM (IST)

    Palghar Rain : पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उध्या सुट्टी जाहीर

    जिखाधिकारी डॉ माणिकराव गुरसल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागानं दिनांक 14 जुलै पर्यंत पालघर जिल्हयात अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांचा निर्णय 13 ते 14 जुलै पर्यंत पालघर जिल्ह्यातील तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेञातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

    पाहा व्हिडिओ

     

  • 13 Jul 2022 07:34 PM (IST)

    Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कलम 144 लावण्याचे आदेश दिले. गड किल्ले, पर्यटन स्थळं येथील अपघात रोखण्यासाठी पर्यटकांना प्रतिबंध असणार आहे. विशेषतः भोर वेल्हा मुळशी जुन्नर मावळ आंबेगाव या तालुक्यातील गड किल्ले, पर्यटन स्थळी बंदी असणार आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:31 PM (IST)

    Nagpur Rain : एकाचा शोध अजूनही सुरूच

    नागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख नाल्यावरून काल स्कार्पिओ कार वाहून गेली होती

    त्यात सहा जण वाहून गेले त्यापैकी तिघांचे मृतदेह काल मिळाले होते

    आज सकाळ पासून एसडीआरफ आणि स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवत आणखी दोन मृतदेह शोधून काढले

    एकाचा अजून शोध सुरू

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:28 PM (IST)

    Nanded Rain : 80 गावांचा संपर्क तुटलेलाच

    नांदेड : जिल्ह्यातील 80 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे, सर्वाधिक 18 गावं एकट्या हिमायतनगर तालुक्यातील आहेत, आसना, पैनगंगा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ होतेय, आज रात्री सावधानता बाळगण्याचे प्रशासनाचं आवाहन आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:18 PM (IST)

    Mumbai Rain : मोडकसागर धरणाची दोन दारं उघडली

    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात  मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे  मोडकसागर धरणातून  991.089 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असून दोन दोन दारं उघडण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिकेने पालघर व ठाणे जिल्ह्यातील नदीकाठच्या 42 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:17 PM (IST)

    Navi Mumbai Rain : नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

    राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाची जुलै महिना सुरु झाल्यापासून जोरदार बॅटींग सुरु आहे. मागील चार दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढत आहे. ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्या गुरुवार 14 जुलै 2022 रोजी सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:14 PM (IST)

    Rain Update : माळशेज घाटात दरड कोसळली

    संततधार पावसामुळे कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटात सावर्णे गावाजवळ महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून झाड बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 06:37 PM (IST)

    Pune Rain : पुण्याला मुसळधार पावसाचा तडाखा

    पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री डोंगर परिसरात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने थेट डोंगरावरून पायरी मार्गाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला रौद रूप प्राप्त झाले आहे. मात्र अशातही जीव धोक्यात घालून भाविक आणि पर्यटक डोंगरावर जात आहेत. लेण्याद्री डोंगरावर पडत असलेला सर्व पाऊस याच पायरी मार्गाने जोरात खालच्या दिशेने येत असताना या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 06:21 PM (IST)

    Wardha Rain : वर्ध्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे धरणाचे 3 दरवाजे 5 सेमी ने उघडण्यात आले असून 24 क्युसेकचा विसर्ग होणार आहे . तरी सर्व यंत्रणांनी याबाबत ग्रामस्थांना अवगत करावे. ही विनंती, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 13 Jul 2022 06:17 PM (IST)

    Pune Rain : 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर

    पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळून 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दिनांक 14 ते 16 पर्यंत ही सुट्टी जिल्हा https://www.tv9marathi.com/wp-admin/admin.php?page=stories-dashboardप्रशासनाकडून जाहीर केली आहे, यामध्ये इंदापूर, पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर या तालुक्यातील शाळांना सुट्टी नसणार आहे इतर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, परिपत्रक काढून जिल्हाधिकार्यांनी हे आदेश दिले आहेत.

    हवामान खात्याचा अंदाजही पाहा

  • 13 Jul 2022 06:12 PM (IST)

    Pune Rain : जोरदार पावसानं नागरिकांच्या घरात पाणी

    पुण्यातील उत्तमनगर भागात नागरिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी

    जोरदार पावसानं नागरिकांच्या घरात पाणी

    घरातील संसारोपयोगी साहित्य भिजलं

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 05:37 PM (IST)

    Dhule Rain : धुळ्यात दोन दिवसाच्या दांडी नंतर पाऊसाची हजेरी

    सुमारे तासाभरा पासून पावसाची संततधार सुरु आहे. साक्री तालुक्यातील मालमथा परिसरात पाऊसामुळे निसर्गाचं विहंगाम दृश्य पाहायला मिळत आहे. अक्कलपाडा धरणाची पातळी वाढली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 05:35 PM (IST)

    Kolhapur Rain : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम

    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. आता नदीची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा उद्या दुपारपर्यंत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. तसेच शहर परिसरात पावसाची उघडझाप तर धरणक्षेत्रात संततधार कायम आहे.

  • 13 Jul 2022 05:24 PM (IST)

    Pune Rain : पुण्यातील खडकवासला धरणावर पुणेकरांची गर्दी

    पुण्यातील खडकवासला धरणावर पुणेकरांची गर्दी झालीय. सध्या धरणातून 13 हजार क्यूसेकनं पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे पाणी बघण्यासाठी पुणेकरांनी परिसरात जमायला सुरूवात केली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 05:22 PM (IST)

    Palghar Rain : पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सर्व तालुक्यात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. उद्या सुद्धा पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी उद्या 14 जुलै सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 05:21 PM (IST)

    Satara Rain : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 40.63 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरु आहे. धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यानंतर पायथा विद्युत गृह बंद केले होते.

  • 13 Jul 2022 04:56 PM (IST)

    Kokan Rain : कोकणातही पावसाचा कहर सुरूच

    रत्नागिरी – चिपळूण शहरात  शिरले वाशीष्टी व  शिवनदीच्या पुराचे पाणी, शहरातील जुना बाजार पूल परिसरातील नाईक कंपनी परिसरात पुराचे पाणी शिरले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 13 Jul 2022 04:54 PM (IST)

    Rain Update : वैतरणा नदीची पाणी पातळी वाढली

    भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अकलोली येथे वैतरणा नदीची पातळी वाढली आहे. पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तर गरम पाण्याचे कुंड गेले नदीपात्रात बुडून रस्त्या लगतच्या दुकानात सुध्दा शिरले पाणी.

  • 13 Jul 2022 04:49 PM (IST)

    Pune Rain : पुढील 48 तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता

    जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात  पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. 16 जुलैपासून काही ठिकाणी पाऊस ओसरण्याची देखील शक्यता आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:46 PM (IST)

    Osmanabad Rain : उस्मानाबादमध्येही मुसळधार पाऊस

    उस्मानाबाद जिल्ह्यात मागील 24 तासात 44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, आतापर्यंत 243.2 मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या सततधार भिज पावसामुळे शेतात बांधावर पाणी साचले असून ओढ्यात पाणी आले आहे. शेतात पाणी सचल्याने सोयाबीनसह अन्य पिके धोक्यात येऊ शकतात तर पावसामुळे जलसाठ्यात वाढदिवसाच्या झाली आहे. भिज पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आगामी 4 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:42 PM (IST)

    Kokan Rain : अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

    रायगड जिल्ह्यात ढगफुटी झाल्याप्रमाणे धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे, पाऊस विश्रांती घ्यायला तयार नाही,  जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून बुधवारी दुपारी एक वाजल्यानंतर पाणी गेले. तसेच मंगळवारी दुपारी 12 नंतर पुलावरून पाणी गेले ते तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री 9 वाजल्यानंतर ओसरले. परिणामी सलग दुसऱ्या दिवशीही पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक खोळंबून प्रवासी व विदयार्थी यांचे पुरते हाल झाले. त्यामुळे प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी व वाहने पुलाच्या दोन्ही बाजूस अडकून पडली होती. तसेच रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा देखील लागल्या होत्या.

    सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालीतून नागोठणे व सुकेळी येथील शाळेत गेलेले 100 हून अधिक विद्यार्थी पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. ती मुले रात्री नऊ नंतर पालीला आपल्या घरी पोहचली. ही मुले 7 ते 9 तास पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. यामुळे पालक खूप चिंतातूर झाले होते. असे पालीतील पालक डॉ. मयूर कोठारी यांनी सांगितले. शिवाय खेडेगावातून पालीला शाळेत व महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांना देखील सलग दुसऱ्या दिवशी अडकून पडावे लागले. असे शिक्षक शरद निकुंभ यांनी सांगितले.

    पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुलावरून पाणी जात असताना कोणीही पुलावरून प्रवास करू नये, तसेच सर्व तालुका प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचा व खबरदारीच्या सूचना दिल्या असल्याचे सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायणावर यांनी सांगितले.

     

  • 13 Jul 2022 04:35 PM (IST)

    Marathwada Rain : गोदावरी नदीच्या पुराचा विळखा

    औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध सरला बेट परिसराला गोदावरी नदीच्या पुराचा विळखा बसला आहे, परिणामी आज सरला बेटावरील गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुराची महंत रामगिरी महाराजांनी पाहणी केली असून भाविकांनी बेटावर न येण्याचे आवाहन केलं आहे.

    पाहा व्हिडिओ