Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..

Maharashtra news : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच सचिन खरात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जातंय.

Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
News
| Updated on: Aug 26, 2026 | 9:57 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Aug 2026 09:57 AM (IST)

    शेतकऱ्याने पाऊस नसल्याने तीन एकर ऊस मोडला

    गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील शेतकऱ्याने पाऊस नसल्याने तीन एकर ऊस मोडला. एकीकडे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकं करपायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे पाऊस नसल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या शेतकऱ्याने दुष्काळ जाहीर करून गुरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे.

     

  • 26 Aug 2026 09:43 AM (IST)

    दिल्लीकरांना स्वस्त कांदा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

    दिल्लीकरांना स्वस्त कांदा देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय; लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला लोडिंग होण्याच्या प्रतीक्षेत.कांद्याची प्रतवारी-पॅकिंग वेळेत न झाल्याने मालगाडी भरण्यास तब्बल २५ ते २६ तासांचा विलंब. सोमवारी रात्री ११.५० वाजता २१ बोगींची मालगाडी लासलगावात दाखल. सकाळी ७ वाजेपर्यंत रवाना होणे अपेक्षित.
    मालगाडीला विलंबमुळे सेंट्रल वखार महामंडळाला प्रति तास ३ हजार १५० रुपयांचा दंड.


  • 26 Aug 2026 09:15 AM (IST)

    शेतकऱ्याने अडीच एकरातील उडीद पिकावर फिरवला रोटाव्हेटर

    जळगावात आसोदा गावात शेतकऱ्याने अडीच एकरातील उडीद पिकावर फिरवला रोटाव्हेटर. पावसाने दडी मारल्याने आसोदा येथील दत्तू चौधरी या चिंताग्रस्त शेतकऱ्याने उडीद पिकावर फिरवला रोटाव्हेटर. पावसाअभावी लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने बळीराजा हवालदिल. पावसाने ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पाठ फिरवल्यामुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी संकटात.

  • 26 Aug 2026 09:10 AM (IST)

    टिपू सुलतान यांच्या फोटोवरून हिंदुत्ववादी संघटनांचा अल्टीमेटम

    उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजच्या आज हा फोटो हटवावा, अन्यथा महापालिकेत घुसून आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. टिपू सुलतान यांच्या फोटोसोबतच फातिमा शेख यांच्या फोटोला देखील हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकारामुळे शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे.

  • 26 Aug 2026 09:10 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यातील १९ निवासी आश्रमशाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न!

    धाराशिव जिल्ह्यातील ३८ निवासी आश्रमशाळांपैकी सातवीपर्यंतच्या १९ आश्रमशाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी महिला अधीक्षक नसल्याची धक्कादायक माहिती समोर नियमाप्रमाणे मुलींच्या निवासी आश्रमशाळेत महिला अधीक्षकाची नियुक्ती असणे आवश्यक असताना, १९ शाळांमध्ये महिला अधीक्षक नसल्याची माहिती समोर आल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


  • 26 Aug 2026 09:07 AM (IST)

    नाशिक शहरासह जिल्ह्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’

    हवामान विभागाकडून आज यलो अलर्ट. काल दुपारी १२ वाजल्यापासून शहर व परिसरात वेगवान वाऱ्यासह मध्यम सरींचा पाऊस….सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात २.१ मिमी पावसाची नोंद…आज घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता….

     

  • 26 Aug 2026 08:55 AM (IST)

    पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ईद-ए-मिलादचा उत्साह

    सोलापुरातही ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांकडून मोठी तयारी करण्यात आलीय. मुस्लिमबहुल भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारची सजावट करण्यात आलीय. तर शहरातील प्रमुख चौकांमध्ये इस्लामिक संस्कृती आणि पैगंबरांच्या जीवनाशी संबंधित विविध देखावे साकारण्यात आलेत.

     

  • 26 Aug 2026 08:40 AM (IST)

    महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं हॉटले व्यवसाय पदार्पण

    अनेक राजकीय नेते ह्या उद्घाटनाला उपस्थित होते मात्र त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चाना उधाण आलय. दोन दिवसांपूर्वी कल्याणीनगर मधील पॉश भागात The Nines या नावाने हॉटेल सुरू केलं आहे. मात्र हे हॉटेलच उद्घाटन झाल्यानंतर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्या वर टीकेची झोड उठवली आहे

  • 26 Aug 2026 08:30 AM (IST)

    मुंबईतील इसेटर्न फ्रीवेच्या खालून वडाळाहून शिवडीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्या.

    खारू खाडीवरील पूल धोकादायक झाल्याने सर्व वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाहतूक बंद करण्यासाठी प्रशासनाने बॅरिकेड्स त्या ऐवजी संपुर्ण रस्ताच खोदून ठेवलाय.  मुंबई बंदर प्राधिकरणाकडून पुलावर स्पष्ट सूचना फलक लावण्यात आला. पूल कमकुवत झाल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागून तीन बाळांच्या मृत्यू झाला. पहाटे जन्मलेल बाळ उपचाराविना रुग्णालयातून परत. नेर पिंगळाईचे पालक फैजान खान यांची मोठी ससेहोलपट; आईची प्रकृती चिंताजनक, बाळाला घेऊन खाजगी रुग्णालयात धाव. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला. त्यातच अभिजीत दिपके यांनी अत्यंत मोठा इशारा दिला. अभिजीत दिपके सरकारविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. अभिजीत दिपके 5 सप्टेंबरला मोर्चा काढणार आहेत. देशात साखरेचे भाव गगणाला पोहोचताना दिसत आहेत. त्यामध्येच सरकारकडून मोठे पाऊले उचलली जात आहेत. काही नियमात त्यांनी बदल केले.

Follow Us