Shiv Thakare : सध्या भीतीचं वातावरण… शिव ठाकरेचा अविवाहित राहण्याचा निर्णय, मोठं वक्तव्य चर्चेत
Shiv Thakare : कोणी गडावरुन फेकतंय, कोणी ड्रममध्ये... फक्त मुलीचं नाही मुलं देखील..., शिव ठाकरे याने घेतलाय अविवाहित राहण्याचा निर्णय, अभिनेत्यांच भारतीय लग्न संस्थेबद्दल मोठं वक्तव्य

Shiv Thakare : शिव ठाकरे याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. शिव याने मराठी बिग बॉस सीझन 2 मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. आज शिव याचा प्रवास प्रत्येकाला माहिती आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज शिवा याने अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. पण लग्नाबद्दल शिव याचे विचार फार वेगळे आहेत. अनेक जण सुखी संसाराची स्वप्न पाहात असतात. पण शिव याला लग्नाची भीती वाटते नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शिव याने सध्याची परिस्थिती आणि भारतीय लग्न संस्थेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या शिव याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर शिव याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अनेकांचा त्याला एकच प्रश्न असतो आणि तो म्हणजे ‘शिव लग्न कधी करणार?’, दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत देखील शिव याला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा शिव याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
मुलाखतीत शिव म्हणाला, ‘मला लग्नच करायचं नाही. कोणी डोंगरावून फेकत आहे, तर कोणी ड्रममध्ये आहे… सध्या भीतीचं वातावरण आहे. फक्त मुलीच नाही तर, मुलं देखील असं करत आहेचत. भारतात आणि महाराष्ट्रात लग्न म्हणजे शुभमंगल सावधानपासून खोकल्याचं औषध शेअर करण्यापर्यंत एकत्र असं होतं… असं म्हटलं जातं की, लग्नाच्या पाच वर्षांनंतर जुळत नाहीच, हे सगळं पाहून लग्न न करण्याची मानसिकता झाली आहे.’
शिव पुढे म्हणाला, ‘असं नाही की मला लग्न करायचं नव्हतं, पण आता विचार बदलत आहेत. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांनाच नातं टिकवायचं आहे, मग ती नाती तोडणारी कोण आहेत? सगळ्यांना पार्टनरकडून प्रामाणिकपणा हवा असतो. मग चिटिंग कोण करतंय? जोडीदाराची गरज नक्कीच आहे. पण नातं तुटल्यानंतर घटस्फोट, दोन कुटुंबांना त्रास, कोणचं तरी मन दुखणं… या सगळ्या गोष्टींचा विचार केला की भीती वाटते.’ असं देखील लग्नाबद्दल शिव ठाकरे म्हणाला.
