
अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा एप्रिलपासून सुरू होणार आहे. अमरावती विमानतळावर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आवश्यक यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. डीजीसीएची (DGCA) टीम पाहणीसाठी अमरावतीत येणार आहे. या पाहणीनंतर रात्री विमानांची ये-जा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (MADC) कामांना गती देण्यात येत आहे. यावेळी धावपट्टी वाढ व इतर पायाभूत सुविधांमुळे विमानतळ अधिक सक्षम होणार आहे. या नाईट लँडिंगमुळे अमरावती जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.
नांदेडमध्ये शिवजयंती मिरवणुकीत विनापरवाना डीजेवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी डीजे हटवताना काही तरुणांनी विरोध केला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी डीजेचे साहित्य पळवण्याचा प्रयत्न रोखताना कारवाई केल्याची माहिती भाग्यनगर पोलिसांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीची चर्चा ताजी असतानाच आज शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात नवी राजकीय समीकरणे जुळत आहेत का आणि ही वाढती जवळीक महायुतीमध्ये नवीन वळण घेणार का? अशा चर्चांना आता वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदापूर येथील कथित अपहरण प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. यावेळी तरुणीने स्वतः बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन आपले अपहरण झाले नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. माझे कोणाकडूनही अपहरण झाले नसून मी स्वतःच्या इच्छेने मुलासोबत गेले होते,” असे प्रतिज्ञापत्र तिने पोलिसांना सादर केले आहे. विशेष म्हणजे, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेल्याचा आरोपही तिने फेटाळून लावला आहे. आपले संबंधित मुलासोबत गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे तिने मान्य केले आहे. कुटुंबाला या प्रेमसंबंधांची कल्पना देऊनही त्यांनी खोटी तक्रार दाखल केल्याचे तिने नमूद केले आहे. आता या प्रकरणात पोलीस त्या तरुण आणि तरुणीला बारामती न्यायालयात हजर करणार आहेत.
राज्यसभेच्या एका जागेसाठी आमच्याकडे संख्याबळ आहे. यावर महाविकासाआघाडी चर्चा करुन निर्णय घेणार आहे. आम्हाला संधी मिळावी हे प्रत्येक पक्षाला वाटतं. कुणी प्रतिनिधीत्व करावं हे तीन पक्ष मिळून ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले.
शेतीतील AI फक्त प्रयोगापुरते मर्यादित राहायला नको. AI अनेक संकटांचा अंदाज लावू शकतो. AI शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी AI साठी सज्ज झाले आहेत. AI मुळे शेतीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते AI समिटमध्ये बोलत होते.
Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी पहिली परीक्षा देणे सक्तीचे केले आहे. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल.
मुलीच्या नावामागील वडिलांचे नाव आणि जात हटवण्याचे आदेश. एकल मातांना पूर्ण पालक म्हणून संवैधानिक मान्यता; पितृसत्तात्मक परंपरेपेक्षा मुलाच्या सन्मानाला प्राधान्य. शालेय नोंदीत आईच्या जातीप्रमाणे दुरुस्तीचे निर्देश; एकल मातांच्या हक्कांसाठी महत्त्वाचा टप्पा
महासभेत रस्त्यांच्या आणि उद्यानांच्या नामकरणा बाबत 4 प्रस्ताव. सिंहस्थाच्या कामांच्या नियोजना बाबत देखील होणार महासभेत चर्चा. मात्र गोदा प्रदूषणाबाबत पहिल्या महासभेत चर्चा होणार का याकडे लक्ष. सिंहस्थासाठी कोट्यवधींच्या निधीची तयारी. मात्र अनेक वर्षांपासून प्रदूषित असलेल्या गोदावरी प्रदूषण मुक्तीचे काय ? असा सवाल
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष यांच्यासह शिक्षण विभागाची कारवाई. रसायनशास्त्राच्या पेपर ला धाराशिव मधील 3, कळंब मधील 1 आणि तुळजापूर तालुक्यातील 9 अशा एकूण 12 कॉपी बहाद्दरांना शिक्षण विभागाचा दणका तर कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या सहा शिक्षकांवर शिक्षण अधिकाऱ्यांकडून निलंबनाची कारवाई
रंगशारदा सभागृहात आज सकाळी दहा वाजता होणार बैठक. बैठकीला महाराष्ट्रातील मनसेचे सर्व नेते पदाधिकारी राहणार उपस्थित. निवडणुकीनंतरची पहिली राज्यस्तरीय बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडणार
नाशिकमध्ये स्थायी सभापतिपदाची बुधवारी निवडणूक होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. उमेदवारी ठरविण्यात मंत्री गिरीश महाजन तसेच अन्य कोअर कमिटी सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जलसंपदा विभागाची आज उच्चस्तरीय बैठक होणार त्यामध्ये पाणी बंद करण्याबाबत चर्चा होणार आहे. महापालिकेने पाणीपट्टी भरली नाही तर पुढील आठवड्यात खडकवासला वरील पंप बंद करण्याची तयारी सुरू आहे. 954 कोटी रुपये थकीत भरण्याचे जलसंपदा विभागाचे पालिकेला पत्र तर पालिकेकडून 400 कोटी रुपये आमचे तुमच्याकडे असल्याचे जलसंपदा विभागाला पत्र देण्यात आले. थकीत पाणी पट्टी भरली नाही तर पाणी बंद करण्याचा जलसंपदा विभागाचा पत्रात इशारा देण्यात आला.
शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळला.आमिषाला थारा नाही. राष्ट्रवादी पक्ष महायुती सोबतच राहणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी भूमिका मांडली. निवडणुकीपूर्वी महायुती होती आणि नंतर देखील असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
बनावट जन्म दाखल्याप्रकरणी नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. खोटे जात प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली. जन्म प्रमाणपत्राची प्रत मनपाच्या कार्यालयात ऑनलाइन प्रणालीत प्रमाणपत्रावरील नोंदणी क्रमांक तपासला असता हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे निदर्शनास आले. संशयित शेख नायजा नूर महंमद या महिलेने बनावट व खोटे जन्म प्रमाणपत्र तयार करून ते खरे असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाच्या छापा टाकण्यास गेलेल्या अन्न व औषध अधिकारी रेणुका पाटील या महिला अधिकार्याच्या अंगावर गाडी घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात घडला.माढ्याच्या बावी गावामधील धक्कादायक घटना घडली. गुटख्याचा साठा असलेल्या तिन पिकअप पैकी दोन पिक अप गुटख्यासह ताब्यात घेतले असून एक पिकअप पसार झालाय. माढा पोलिसांत जीवे मारण्याच्या प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी पहिली परीक्षा देणे सक्तीचे केले आहे. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल.नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने दहावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी व बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील १९१ परीक्षा केंद्रे संवेदनशील असून, त्यापैकी ४२ ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार आहे. ५५४ केंद्रांवर अद्याप कॅमेरे बसविलेले नाहीत. मागील वर्षी ३१ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती.परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. राज्यात ९,७८८ दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पुण्यातील दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वापराची मुभा देण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता आली आहे. त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण सामाजिक न्याय विभागाचा 98.45 कोटींचा निधी त्यासाठी वर्ग करण्यात आला आहे. तर अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल येत्या 28 फेब्रुवारीपूर्वीच येणार असल्याचे समजते. त्यामुळे हा अपघात होता की घातपात यावर लवकरच प्रकाश पडेल. राज्यसभेसाठी मोर्चबांधणी सुरू आहे. भाजपच्या निष्ठावंतांनी आयाराम-गयारामला खासदारकी देण्यास विरोध केला आहे. राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर लाचप्रकरणात झिरवळ यांच्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेचा आजपासून श्रीगणेशा होत आहे. तर एपस्टिन प्रकरणात ब्रिटनचे राजपुत्र अँड्रयू यांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशातील व्हिसा सेवा लवकरच सुरू होणार आहे.