AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन, दिल्लीत निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा, विरोधक आक्रमक

शिवसेना ठाकरे गटाने महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मुंबईसह राज्यात झाले. दुसरीकडे, दिल्लीत इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेविरुद्ध मोर्चा काढला. दोन्ही आंदोलने देशाच्या राजकारणात मोठी चर्चा निर्माण करत आहेत.

महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन, दिल्लीत निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा, विरोधक आक्रमक
rahul-gandhi-uddhav-thackeray-2
| Updated on: Aug 11, 2025 | 8:40 AM
Share

महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत दादर परिसरात हे आंदोलन होणार असून या आंदोलनाला स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. या आंदोलनावेळी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने केली जाणार आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार मतचोरीच्या आरोपांवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत.

मुंबईत जनआक्रोश आंदोलनाची हाक

दादरमधील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 वाजल्यानंतर हे आंदोलन होईल. या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात केवळ शिवसैनिकच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. महायुती सरकार भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ‘हनीट्रॅप’ आणि इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महायुतीतील मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मुख्य मागणी ठाकरे गटाची आहे. सरकारने या मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करावी, असेही शिवसेनेने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईसह राज्यभरात जनआक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

दिल्लीत इंडिया आघाडीचे आंदोलन

तर दुसरीकडे आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार दिल्लीत आंदोलन करणार आहेत. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. याच आरोपांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात विरोधी पक्षातील सर्व खासदार सहभागी होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांमध्ये निष्पक्षपणे काम केले नाही. त्यामुळे मतमोजणीत फेरफार केल्याने सत्ताधारी पक्षाला फायदा झाला. या आरोपांची सखोल चौकशी करा, अशी मागणी विरोधी खासदारांकडून करण्यात आली आहे.

काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर प्रमुख विरोधी पक्षांचे खासदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनातून ते निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत. हे दोन्ही आंदोलन एकाच वेळी होत असल्यामुळे आज देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबबळ उडाली आहे. एकीकडे महाराष्ट्रात सरकारविरोधात आवाज उठवला जात आहे, तर दुसरीकडे दिल्लीत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.