AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर दुहेरी संकट, तब्बल इतके जिल्हे धोक्यात, पुढील 24 तास मोठं संकट, थेट..

Maharashtra Temperature Today 1th May 2026 : भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवसात हवामानात मोठा बदल होईल. कुठे पाऊस तर कुठे प्रचंड उष्णता अशी स्थिती आहे.

राज्यावर दुहेरी संकट, तब्बल इतके जिल्हे धोक्यात, पुढील 24 तास मोठं संकट, थेट..
Maharashtra Temperature Today
| Updated on: May 01, 2026 | 7:28 AM
Share

राज्यातील हवामानात कमालीचा बदल झाला. उष्णता प्रचंड वाढली आहे. सूर्य आग ओकत आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच. विदर्भात अनेक ठिकाणी पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. आजही राज्यात उष्णतेचा चटका कायम असेल विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. मुंबईमध्ये आजपासून पुढे 4 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपायोजना राबवल्या जात आहेत. भंडारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तीव्र उष्णतेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने अत्यावश्यक काम असल्यासच दुपारी घराबाहेर पडावे, अन्यथा भर उन्हात बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 2 मेपासून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता देखील विदर्भात वर्तवण्यात आली. 2 तारखेनंतर विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील बाकी ठिकाणी उष्णता कायम असेल.

महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्याचे तापमानाचा पारा 40 च्या पुढे राहणार आहे. काही लोकांकडून तापामानाबाबत समाज माध्यमांवर चुकीचे संदेश पसरवले जात आहेत, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, हवामान विभागाकडून अधिकृत माहिती दिली जातेय यावर विश्वास ठेवा असे हवामान विभाग शास्त्रज्ञ एस. डी सानप यांनी सांगितले.

संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पारा 42 ते 43 अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तालुक्यांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसत आहेत. दरम्यान, पाचोरा तालुक्यात उष्माघातामुळे एका फळविक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं