AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला असाही फटका, मुंबईपासून नाशिकपर्यंत हुडहुडी, तुमच्या शहराची परिस्थिती काय?

मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर या भागातील तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र हुडहुडी भरल्याचे पाहायला मिळत आहे.

फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला असाही फटका, मुंबईपासून नाशिकपर्यंत हुडहुडी, तुमच्या शहराची परिस्थिती काय?
महाराष्ट्रात थंडी
| Updated on: Dec 09, 2024 | 9:16 AM
Share

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळ दक्षिण भारताला मोठा फटका बसला. त्याचाच परिणाम सध्या मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात तापमान 10 ते 20 अंशाच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच पश्चिम उपनगरात गारठा वाढला आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर या भागातील तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र हुडहुडी भरल्याचे पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरील प्रभाव संपला आहे. त्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात 17.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 3 दिवसात मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. सध्या मुंबई उपनगर आणि नवी मुंबईतही गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिकमध्ये पुन्हा हुडहुडी

नाशिकमध्येही थंडीचा पारा पुन्हा घसरला आहे. नाशिकमध्ये तब्बल 3 अंशांनी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल नाशिकमध्ये 12.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिकचा पारा आणखी कमी झाला असून आज 9.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तब्बल एका आठवड्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा थंडी परतली आहे.

फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने निफाडमध्ये थंडीचे जोरदार पुनरागमन झाले आहे. निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ओझर HAL येथे 5.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात 67 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढलेल्या थंडीपासून ऊब मिळावी, यासाठी शेकोट्याही पेटवण्यात आल्या आहेत.

धुळ्यात तापमानात मोठी घट

धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. धुळे शहरात तापमान 9.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसापासून तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. मात्र आता अचानक अपमान 9 अंशावर पोहोचले आहे. थंडी वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. धुळ्यात थंडी वाढल्याने पांजरा नदी किनारी फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे.

पुण्यात थंडीचे कमबॅक

पुण्यातही थंडीचे कमबॅक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात फेंगल वादळाचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर पुण्यासह राज्यातील तापमानात एका दिवसात ४ अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. पुण्यात रविवारी अचानक थंडीत वाढ झाल्याने किमान तापमान १६ अंशांवर नोंदवले गेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार, दि.१८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत ‘फेंगल’ चक्रीवादळाने थंडी गायब झाली होती. मात्र आता पुन्हा उत्तर भारतात मार्गस्थ होत असलेले पश्चिमी वारे आणि समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत वाढ होणार आहे.

जालन्यातील रुग्णसंख्येत वाढ

जालना जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून बदलत्या वातावरणामुळे थंडी, ताप, खोकला आणि सर्दी अशा आजारांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा फटका प्रामुख्याने लहान मुलांना बसत असल्याचे दिसत आहे. यामुळे सरकारी दवाखान्यांसह खाजगी रुग्णालयातही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. मागील आठवड्यापासून वातावरणात कमालीचा बदल झाल्याने गारवा देखील वाढला आहे. याचाच परिणाम थेट जनआरोग्यावर झाला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.