उपमुख्यमंत्री शिंदेंच्या परभणी दौऱ्यावरून मनोज जरांगेंचं मराठ्यांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन, म्हणाले, मी आल्यावर…
उपमुख्यमंत्री शिंदे परभणी दौऱ्यावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी मराठ्यांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शिंदेंना परभणीचा शेतकरी मेळावा रद्द करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदेंचा परभणी दौरा होणार आहे. मेळाव्यासाठी सर्व शेतकरी आल्यानं कार्यक्रम रद्द करू शकत नसल्याचे कारण खासदार संजय जाधव यांनी दिली. परंतु खासदार संजय जाधव यांनी मोठी चूक केल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली. पण मी परभणीत येणार नाही. मराठा तरुणांनी आक्रमक भूमिका घेऊ
नका. सर्वांनी शांत राहावे. मी आल्यावरच तुम्ही परभणीत यावे, असं आवाहन जरांगे यांनी केले.
पोलिसांचा आणि आमचा संबंध नाही – जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांच्या पोरांनी शांत राहावे. मी आल्याशिवाय काय करू नये. मी जिल्ह्यातील बांधवांना सागंतो की, मी आल्यावर तुम्ही यावे. आपल्याला ताकद वाया घालवायची नाही. ते गेल्यानंतर आपल्याच ताब्यात येईल. नांदेडचेही लोक रस्त्यावर आले, तर शिंदे हेलिकॉप्टरने थेट मुंबईला जाईल. आपण जाऊन ताकद वाया घालवायची नाही. मी हा देखील विचार करत आहे. जालन्यातून परभणीत वेळेत पोहोचणं शक्य वाटत नाही. पोलिसांचं टेन्शन घेऊ नका. परभणी नाकाबंदी केली तरी काही अडचण नाही. पोलिसांचा आणि आमचा संबंध नाही. सरकार आणि आमचा संबंध आहे.
एकनाथ शिंदं समोरासमोर भेटले पाहिजे – मनोज जरांगे
‘मी निघाल्यावर रस्त्यावर एकच गर्दी होईल. त्यांना नांदेडमध्ये जाणं अवघड होईल. आपला आणि त्यांचा सामना झाला पाहिजे. मर्दासारखा सामना झाला पाहिजे. मग काय व्हायचं ते होऊ द्या. त्यांना रक्तपात करायचं असेल, तर होऊद्या. त्यांच्या हातातून होऊ द्या. पण सामना झाला पाहिजे. सामना बरोबरीचा झाला पाहिजे. एकनाथ शिंदे समोर भेटले पाहिजे. पोलिसांची काळजी करू नका. पोलिसांचं टेन्शन करू नका. त्यांचं मी बघतो. खोटा टाइम मॅच करू नका. माझ्या समाधानासाठी वेळ देऊ नका. सामना होणे गरजेचे आहे, असे जरांगे पुढे म्हणाले.