AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?

मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?

| Updated on: Aug 30, 2026 | 12:49 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणीतील शेतकरी मेळाव्याला विरोध दर्शवत थेट इशारा दिल्यानंतर, खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी मेळाव्याला उपस्थित राहिल्यास पंचायत होईल, असा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणीतील शेतकरी मेळाव्याला विरोध दर्शवत थेट इशारा दिल्यानंतर, खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी मेळाव्याला उपस्थित राहिल्यास पंचायत होईल, असा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. परभणीमध्ये गेल्या २० ते २५ दिवसांपासून या शेतकरी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू होती. या प्रकरणी आता शिंदे गटातील नेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नरेश मस्के यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, राज्य सरकारने मराठा समाजाला आश्वासने दिली होती आणि या आश्वासनानुसार त्यांना दाखले मिळणे अपेक्षित होते, असे नमूद केले. काही दाखले रद्द झाल्याचे निदर्शनास आल्याने जरांगे पाटलांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याचे ते म्हणाले. संबंधित मंत्र्यांनी मराठा समाजाचे मुद्दे स्पष्ट करणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाज आंदोलनात असताना असे उत्सव साजरे करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी मेळावा रद्द करण्याची मनोज जरांगे पाटलांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले.

Published on: Aug 30, 2026 12:49 PM

Follow Us