AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील राजकारणात प्रवेश करणार? पुन्हा दिला सरकारला इशारा

मराठा समाज प्रचंड संख्येने रस्त्यावर उभा आहे. समाजात वेदना आहे. मी सामान्य माणूस आहे. हे आंदोलन आता सामान्य माणसाने हाती घेतले आहे. समाजाला विरोध करून कुणी त्याला अंगावर घेणार नाही. सामान्य मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका मी बजावत आहे.

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील राजकारणात प्रवेश करणार? पुन्हा दिला सरकारला इशारा
CM EKNATH SHINDE, DCM DEVENDRA FADNAVIS AND MANOJ JARNAGE PATIL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Oct 02, 2023 | 8:27 PM
Share

परभणी : 2 ऑक्टोबर 2023 | ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात येतंय. त्यांनी त्याचे आंदोलन केलंच पाहिजे. त्याला आमचा विरोध नाही. ते काय आम्ही काय एकत्रच आहोत. पण त्यांना कुणी उचकवू नये. ते त्यांच्या हक्कासाठी भांडत आहेत आम्ही आमच्या हक्क्साठी भांडतोय. आरक्षण कुणाचेही असो आंदोलन केलं पाहिजे. तो घटनेने दिलेला अधिकार आहे. देशात, राज्यात आंदोलने चालू असतात. पण, राज्य शांत ठेवायचे आहे. एकमेकांच्या विरोधात जायचं नाही. सरकारला आम्ही चाळीस दिवस दिले आहेत. तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. त्यांना त्याचं काम करू द्या. जे काही बोलायचं ते चाळीस दिवसांची मुदत संपल्यानंतर बोलेन असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.

आम्ही मराठा आरक्षण घेणारच आहोत. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने समिती नेमली. ती त्यासाठीच नेमली आहे. आमच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु झाले. त्यांना कोणता पक्ष चीथवतो, कोणता नेता चीथवतो यावर आता काही बोलायचे नाही. जे काही बोलेन ते चाळीस दिवसांनतर बोलेन असे ते म्हणाले.

सरकारने आमच्याकडून कळीस दिवसाचा वेळ घेतला. तो काही आम्ही दिलेला नाही. आम्ही त्यांची विनंती ऐकली. त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठा आरक्षण ही आमची वेदना आहे. लाखो लोक भेटायला येत आहेत. सरकारने समाजाची ही भावना लक्षात घ्यावी. वेदना कमी झाली पाहिजे. सरकार वेद्नाशुन्य नाही. पण, त्यांनी जागे होण्याची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने 14 तारखेपर्यंत आरक्षण जाहीर करणार असे सांगितले आहे. मी आशावादी आहे, ओबीसी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे मात्र त्यांच्या मागण्याला माझा पाठिंबा नाही. ओबीसी, मुस्लिम, धनगर हा सर्व समाज आमच्यासोबत आहे. यावेळी आरक्षण मिळवून द्यायचंच आहे असे त्यांनी सांगितले.

नेता होणे ही आपली वाट नाही. आपली वाट एकच मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे. समाजाची पूर्वीपासूनची वेदना आहे. त्यामुळे हा लढा उभारला आहे. राजकारणात येण्याचा प्रश्नच नाही. ती आपली वाट नाही. राजकारणाचा विचार सध्या तरी नाही. सध्या विचार आहे तो फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Follow Us
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....