
मराठा समाजासाठी दिवसरात्र झटणारे मनोज जरांगे पाटील यांचं आज एक नवं रूप पहायला मिळालं. जरांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये घोडेस्वारीचा आनंद घेतला.

मनोज जरांगे पाटील यांनी काळा चष्मा घातला आणि गळ्यात भगवा पंचा घेत घोडेस्वारी केली. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, 'आता दिल्ली जायचे आहे कारण मराठ्यांचे अधिवेशन आहे, 70 ते 80 लाख मराठे दिल्ली जाणार आहेत. आता फक्त संपलेल्या लोकांचे नाव काढायचे नाही.'

जरांगे पाटील हे घोडस्वारी करत असताना अनेक मराठा बांधव त्यांच्यासोबत होते. आता काही दिवसांनी हे सर्व मराठा बांधव दिल्लीला जाणार आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जरांगे पाटलांच्या कित्येक वर्षांच्या लढ्याला यश आले आहे.