मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मोठे विधान केले. छगन भुजबळ यांच्याबद्दल जरांगे पाटलांनी हे विधान केले. यासोबतच मराठा आणि ओबीसी यांच्यात संबंध कसे आहेत, यावरही ते बोलताना दिसले.

नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले. मराठा समाजाच्या नेत्यांना खडेबोल सुनावताना मनोज जरांगे पाटील दिसले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मंत्री, आमदारांनी मराठा, कुणबींचे नुकसान करू नये. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे काम बंद करा. मराठा आणि कुणबींच्या लेकरांचे वाटोळे करू नका. धनगर समाजाने माझ्याकडून व्हावे, ओबीसींनी माझ्याकडून व्हावे, असे मी अजिबातच म्हणत नाही. मी जे पोटातले आहे, तेच बोलतोय. कारण मी गावखेड्यातील गरीब समाज बघितलाय. गाव खेड्यातील गरीब समाज मी बघितला आहे. मी सगळ्या जाती धर्माचे गरीब लोक बघितले आहेत, सत्य सांगतोय. आम्ही एकमेकांच्या बांधावर आहोत, एकमेकांच्या लग्नात आहोत. एकमेकांच्या सुख दुखात आहोत. उसने पैसे लागले तरीही आम्ही एकमेकांना पैसे देतो. ही सत्य स्थिती आहे.
इथल्या लोकांची दशा बघा. अगदीच मराठी आणि ओबीसीमध्ये दुरावा निर्माण केला जात आहे. पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, गरीब मराठे आणि ओबीसी आता हुशार झालेत. गाव खेड्यातही धनगर शोधून दाखवा. आजही शेळ्या मेंढ्या सांभाळून लेकरं मोठी करावी लागतात. आमची फसवणूक करतायत आमच्या लक्षात येतंय.
मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा. राजकारणत धनगर आणि मराठे काय मोठे होणार आहेत? लय झाले तर 200 ते 300 चा आकडा होईल, राज्यात. त्याने पोट भरणार आहे का? कारण नसताना मी कुणालाही बोलत नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. राजकीय आरक्षण संपलं, असं नेते ओरडतात. तुम्हाला हे समजले पाहिजे की, नोंदी सापडल्यानंतर तु्म्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावेच लागणार आहे.
रोजच्या संबंधांचे काय करायचे. आपल्या लेकरांना अधिकारी बनवणे गरेजेचे असल्याचे जरांगे यांनी म्हटले. भुजबळला कायदा समजतो, मंडळ आयोग समजतो, राज्य घटना आयोग, केंद्रीय मागास आयोग हे सगळे कळते. नोंदी मिळाल्याने हे द्यावेच लागणार आहे, हे माहिती आहे. मराठ्यांचा विरोध न करण्याचा भुजबळांच्या लक्षात आले.