मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, गोपिचंद पडळकरांचा ताफा अडवला
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान त्यानंतर आता मराठा आंदोलक देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. सोलापूर-रत्नागिरी महामार्गावर कामती येथे मराठा आंदोलकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा अडवल्याची घटना घडली आहे. मराठा आरक्षणाबाबत तसेच मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत भूमिका जाहीर करा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली, त्यानंतर लगेचच गोपिचंद पडळकर यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.
नेमकं काय म्हणाले गोपिचंद पडळकर?
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान त्यानंतर आता मराठा आंदोलक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी आज भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांचा ताफा अडवला, मनोज जरांगे पाटील याचं उपोषण सुरू आहे, मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करा अशी मागणी या आंदोलकांनी गोपिचंद पडळकर यांच्याकडे केली, दरम्यान यावर बोलताना गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं की, मराठा समाजाच्या एसईबीसी आणि कुणबी आरक्षणाला आमचा कायम पाठींबा आहे. मात्र खाडाखोड केलेला कुणबी दाखला रद्दच होणार आहे, अशी भूमिका यावेळी मराठा आरक्षणाबाबत पडळकर यांनी जाहीर केली आहे. दरम्यान पडळकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्यानंतर मराठा आंदोलकांनी देखील त्यांचं स्वागत केलं.
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस
दरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे, त्यांची प्रकृती देखील खालवली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिलं होतं, मात्र त्यानंतर त्यांनी सरकारला दोन दिवसांचा वेळ दिला होता, त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला.