AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चा सुरू, आरक्षणासंबंधी गुड न्युज मिळणार का?

Maratha Reservation new GR आज रात्रीपर्यंत विशेष अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. त्यानंतर सरकाच्या दिवसभर मॅराथॉन बैठका पार पडल्या. त्यानंतर रात्री अकरा वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला वाशी येथील पीएमपीएल मार्केटला पोहचले आहे.

Maratha Reservation :  मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यात चर्चा सुरू, आरक्षणासंबंधी गुड न्युज मिळणार का?
मनोज जरांगेImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 26, 2024 | 11:38 PM
Share

मुंबई : मनोज जरांगे यांचा भव्य मोर्चा सध्या मुंबईच्या वेशीवर एपीएमसी मार्केटमध्ये थांबलेला आहे. मनोज जरांगे यांच्या सग्या सोयऱ्यांना आरक्षण (Maratha Aarakshan) देण्याच्या मागणीसंबंधी सरकारने तोडगा काढला का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला आंदोलन स्थळी पोहचलं आहे. या शिष्टमंडळात समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ नुकतेच आंदोलन स्थळी पोहचले असून मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. तुर्तास शिष्टमंडळाच्या सदस्यांपैकी माध्यमांशी बोलण्यासाठी कोणीच तयार नसल्याचंही दिसत आहे.

आज गुड न्युज मिळणार?

आज रात्रीपर्यंत विशेष अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. त्यानंतर सरकाच्या दिवसभर मॅराथॉन बैठका पार पडल्या. त्यानंतर रात्री अकरा वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला वाशी येथील पीएमपीएल मार्केटला पोहचले आहे. माध्यमांशी तुर्तास बोलण्यास नकार दिला आहे. सचिव सुमंत भांगे, मराठवाडा विभागीय आयुक्त मधुकर आरगळ, अमोल शिंदे, मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.

मनोज जरांगे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा सुरू

सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू आहे. सग्या सोयऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षणासंबंधी तसेच आरक्षणासंबंधी इतर मागण्या संबंधी सरकारची भूमीका काय आहे या बाबात चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान आज गुड न्युज मिळणार असं सुचक विधान शिष्टमंडळाने केलं होतं, मात्र त्यावर अधिक प्रतिक्रीया देण्यास त्यांनी नकार दिला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.