AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे मराठे पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात आहेत त्यांचं काय? कुणबी प्रमाणपत्रावरुन अशोक चव्हाण यांचा सवाल VIDEO

Maratha Reservation | मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यावर बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एक मुद्दा मांडला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत लोकांच्या भावना तीव्र आहेत.

जे मराठे पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात आहेत त्यांचं काय? कुणबी प्रमाणपत्रावरुन अशोक चव्हाण यांचा सवाल VIDEO
Ashok ChavanImage Credit source: tv9
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: | Updated on: Sep 08, 2023 | 12:08 PM
Share

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, असं करताना मराठवाड्यापुरता विचार केल्यास उर्वरित महाराष्ट्राच काय? असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विचारला आहे. ” मराठवाड्यापुरता विचार केला, तर मऱाठवाड्यात जुने दाखले आहेत. पण उर्वरित महाराष्ट्राच काय? असा विषय येतो. जे मराठे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आहेत त्यांच काय? त्याच उत्तर अनुत्तरित राहत” असं अशोक चव्हाण म्हणाले. हा कायदेशीर विषय आहे. “कुठल्याही विषयाला सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. तुम्ही म्हणता टिकणार आरक्षण द्यायच आहे, मग तसच टिकणार आरक्षण द्या” असं अशोक चव्हाण म्हणाले.

“वास्तव हे आहे की, आरक्षण 50 टक्केच्यावर जात असेल, तर कायदा बदलावा लागेल. मराठा आरक्षणाच्या बाबतीत लोकांच्या भावना तीव्र आहेत. आरक्षण लवकरात लवकर मिळालं पाहिजे. सरकारकडून कायदेशीर बाबींची पूर्तता होत नाहीय. विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. घटनादुरुस्ती करावी लागेल” असं अशोक चव्हाण म्हणाले. “OBC आरक्षण आहे तसच ठेवलं पाहिजे, त्याला कुठलाही धक्का लावू नये” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. “सगळा हिशोब केल्यास आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असेल, तर घटनादुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. केंद्र सरकारला घटनादुरुस्ती करावी लागेल” असं अशोक चव्हाण म्हणाले. EWS आरक्षणाच दिलं उदहारण

“EWS आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिलं. हे आरक्षण 50 टक्क्यांच्या वर आहे. त्याच पद्धतीने मराठा आरक्षण ओबीसीमध्ये बसवायच असेल किंवा वेगळ्या पद्धतीने द्यायच असेल, तर घटना दुरुस्ती करावी लागेल. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, हीच माझी भूमिका आहे” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. मागच्या आठवड्यात जालना येथे मराठा समाजावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी जालना येथे जाऊन उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!