AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीनगरनंतर धाराशिवचा वादही पेटणार, नामांतराच्या निषेधार्थ MIM आक्रमक, काय घडतंय?

उस्मानाबादच्या नामांतरास विरोध असून नामांतर करण्यात येवू नये या मागणीसाठी आयएमआयएमच्या वतीने 8 मार्च रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

संभाजीनगरनंतर धाराशिवचा वादही पेटणार, नामांतराच्या निषेधार्थ MIM आक्रमक, काय घडतंय?
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 07, 2023 | 11:11 AM
Share

संतोष जाधव, धाराशिव : औरंगाबादनंतर (Aurangabad) आता उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे धाराशिव (Dharashiv) नामकरण केल्याचे प्रकरण पेटणार असल्याचे दिसत आहे. एमआयएमने 8 मार्चपासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. धाराशिव नाव केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर नंतर धाराशिव येथे MIM आमरण उपोषण करणार असल्याने नामांतरला पाठिंबा देणाऱ्या व विरोध करणाऱ्या संघटनांमध्ये वाद पेटणार आहे.

MIM चा आरोप काय?

उस्मानाबाद जिल्हा ऐतिहासिक जिल्हा असून या जिल्ह्याचे नाव धाराशिव ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते मात्र हरकती न मागविता न्यायालयीन प्रकरण असताना केवळ सत्तेच्या बळावर नामांतर केले आहे असा आरोप एमआयएमने केला आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नुकतीच केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबादचे धाराशिव नामांतरासाठी मंजुरी दिली आहे मात्र या नामांतराबाबत नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होतेच शिवाय त्यांच्या हरकती व मते जाणून घेणे आवश्यक होते परंतू तसे न करता नागरीकांना विश्वासात न घेता व न्यायालयीन प्रकरण चालु असताना केवळ सत्ता हाती असल्यामुळे या नामांतरास मंजुरी दिल्यानंतर नागरीकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.

या नामांतराच्या मंजुरीस नागरिक म्हणून आम्ही एमआयएम पक्षाच्या वतीने विरोध दर्शवित आहोत, त्यामुळे उस्मानाबादच्या नामांतरास विरोध असून नामांतर करण्यात येवू नये या मागणीसाठी एआयएमआयएमच्या वतीने 8 मार्च रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून न्याय मागणार आहोत, असा इशारा एमआयएम पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

साखळी आंदोलनाला प्रतिसाद मिळणार?

या उपोषणास अनेकजणांचा सहभाग पाठिंबा राहणार असून याबाबत वरीष्ठांना कळवून आमच्या मागणीचा विचार करुन सहकार्य करावे अशी मागणी केली आहे. यावर एआयएमआयएमचे उस्मानाबाद शहराध्यक्ष सय्यद अजहर मुख्तार, जमीर खलील पठाण, माजीद जावेद शेख (जी.एम.), समीर हमीद शेख, पठाण नुरखॉन अमीनखॉन, अरबाज नदाफ, वसीम निचलकर, शहानवाज पटेल, आसेफ शेख, इर्शाद सय्यद, अतिक शेख, शेख सरफराज, शेख जैद, जावेद शेख, अल्ताफ शेख, नदाफ मझहर व शहबाज शेख यांच्या सह्या आहेत. या साखळी आंदोलनाला आतापर्यंत एकही राजकीय पक्षाने, संघटना यांनी पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे पाहावे लागेल

Follow Us
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल