Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्…
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला असून, पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी आपोआप रद्द होण्याची शक्यता अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे त्यांची अटक निश्चित मानली जात आहे.
आमदार माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता शुक्रवारी (आजचा दिवस बुधवार) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, अंजली दमानिया यांच्या मते, दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या आमदाराची आमदारकी लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ च्या कलम ८ नुसार आपोआप रद्द होते. सुप्रीम कोर्टाच्या लिली थॉमस प्रकरणातील २०१३ च्या निर्णयानंतर कलम ८(४) रद्द झाल्याने, उच्च न्यायालयात अपील केले तरी आमदारकी रद्द मानली जाते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची आणि त्यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक पोलीस अटकेच्या वॉरंटसह मुंबईकडे रवाना झाल्याचेही वृत्त आहे.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?

