AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धनंजय मुंडे पुण्यात घुसलेत, जमिनीची एवढी भूक का लागली?’; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. आव्हाड यांनी मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. "धनंजय मुंडे बीडपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते आता पुण्यात घुसलेत", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

'धनंजय मुंडे पुण्यात घुसलेत, जमिनीची एवढी भूक का लागली?'; जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा
धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड
| Updated on: Jan 05, 2025 | 8:02 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका करताना खळबळजनक दावा केला आहे. “धनंजय मुंडे बीडपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते आता पुण्यात घुसलेत. माझ्याकडे आणखी एक प्रकरण आलंय. ते संभाजीनगरमध्ये पण गेलेत. मुंडे यांना जमिनीची एवढी भूक का लागलीये की सगळ्या जमिनी हव्या आहेत”, अशी खळबळजनक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. “शिवलिंग मोराळे याने अत्यंत फालतू स्टोरी तयार केली आणि माध्यमांना सांगितली. वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे हे याला माहिती नव्हतं का? चौकशी अधिकारी आणि वाल्मिक कराड यांचे फोटो आले. तो अधिकारी काय चौकशी करणार? एक अधिकारी 9 वर्षे पदावर आहे. हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही”, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“माझ्या बाजूला एक स्त्री बसली आहे. या शेड्युल कास्टच्या आहेत. त्यांची जमीन राज धनवट याने अडीच एकर खाल्ली. राज धनवट हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. बलराज वांजीले पोलीस अधिकारी माझ्याकडे काल आला. त्याने सांगितलं की माझ्यावर चौकशी करताना दबाव आणला. अतिरिक्त महासंचालक असताना संजय सिंघल या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पत्र दिलं होतं. 9/8/2023 रोजी पत्र दिलं होतं. चौकशी करा. मात्र त्या चौकशीचं काय झालं?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘एखाद्या आरोपीला जातीचा चेहरा लावणं गंभीर’

“धनवट याच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून 10 पोलीस अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची चौकशी लावली. वाल्मिक कराड हा वंजारी समाजाचा चेहरा नाही. एका आरोपीला समाजाचा चेहरा करणं योग्य नाही. प्रत्येक हिंदूला विचारतो तुम्ही एवढे निष्ठुर होऊ शकता का? बीडमधील टिपराट गुंड वाल्मिक कराड हा काय समाजाचा चेहरा आहे काय? एखाद्या आरोपीला जातीचा चेहरा लावणं गंभीर आहे. उद्या जातीजातीत दंगली होतील”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘एकटे फडणवीस काम करताना दिसत आहेत’

“सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका आहे. मी पण वंजारी समाजाचा आहे. पण ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने मी उभा राहिलो. मी घाबरलो नाही. 43 जणांचे मंत्रिमंडळ आहे. पण एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करताना दिसत आहेत”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.