AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…हा महाराष्ट्र संजय राऊतांमुळे गढूळ होत चाललाय”; शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटावर साधला निशाणा…

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र संजय राऊत यांच्यामुळे गढूळ होत चालला आहे. अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

...हा महाराष्ट्र संजय राऊतांमुळे गढूळ होत चाललाय; शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटावर साधला निशाणा...
| Edited By: | Updated on: Jan 22, 2023 | 2:47 PM
Share

अहमदनगरः महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी सत्तांतर झाल्यापासून शिंदे-ठाकरे गटाकडून एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता सहा महिन्यानंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे प्रचाराच्यानिमित्ताने आणखी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच काय झाडी, काय डोंगर या मोबाईलवरील संभाषणामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या आमदार शहाजी बापू यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र संजय राऊत यांच्यामुळे गढूळ होत चालला आहे अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे ठाकरे-शिंदे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.

शिंदे-फडणवीस सरकार सहा महिन्यापूर्वी अस्तित्वात आले असले तरी, हे सरकार असंविधानिक असल्याची टीका सातत्याने ठाकरे गटाकडून केली जाते. त्या टीकेला तेवढ्याच जोरदार पणे शिंदे गटाकडून प्रतिक्रिया दिली जात असतात.

यावेळीही आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटावर टीका करताना शिंदे गटाचा गौरव करत शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारची राज्यात विकासाची घोडदौड जोरदारपणे सुरू असल्याचे सांगितले.

सहा महिन्यात स्थापन झालेल्या सरकारने विकासाबाबत कोणतीच कसूर सोडली नाही. त्यामुळेच महाराष्ट्राची जनता ही शिंदे-फडणवीस यांच्या पाठीशी उभा आहे असा विश्वासही त्यांनी .यावेळी व्यक्त केला.

आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर काही दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्राला जागृत करण्याची गरज नाही. कारण आता शिंदे-फडणवीस सरकारबरोबर महाराष्ट्रातील जनता आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी आपण महाराष्ट्रातील राजकारण हे 1962 पासुन आपण पाहतो आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र संजय राऊत यांच्यामुळे गढूळ होत चालला आहे. अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

तर प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे युतीबाबत प्रकाश आंबेडकरच सांगू शकतील असं म्हणत त्यांच्या युतीबद्दल त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.