AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणसे मेलेली चालतात कबूतरे नाही, कोण जैन लोक…कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis and Raj Thackeray meet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झालीये. यादरम्यान दोघे 50 मिनिटे एकत्र होती. सध्याच्या राजकिय वातावरणात या भेटीला अधिक महत्वप्राप्त झाले. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीचा थेट मुद्दाच सांगून टाकला आहे.

माणसे मेलेली चालतात कबूतरे नाही, कोण जैन लोक...कबुतरखान्याच्या वादावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray
| Updated on: Aug 21, 2025 | 12:01 PM
Share

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे हे सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत आगामी काळातील निवडणूका लढवण्याचे संकेत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. तब्बल 50 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट नेमकी कोणत्या मुद्दावर झाली, हे स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबुतरखान्याच्या वादावरही बोलताना राज ठाकरे हे दिसले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. असे कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाचे आहेत. तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नव्हता. ते विषय भरकटवतात, असे राज ठाकरेंनी म्हटले.

कोर्टाने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर जैन समाज हा आक्रमक झाला. हेच नाही तर दादर कबुरतखाना परिसरात जैन समाज आक्रमक झाला आणि त्यांनी महापालिकेने लावली ताडपत्री फाटून टाकत कबुतरांना धान्य टाकले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाची झाली आणि दादर परिसरात तणावाचे वातावरण झाले. त्यानंतर मराठी एकीकरण समितीही आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

जैन मुनींना याप्रकरणात काही धक्कादायक विधाने केली. त्यावेळी मनसेकडून कबुतरखाना प्रश्नावर कोणत्याही प्रकारची भूमिका घेण्यात आली नाही. आता राज ठाकरे यांनी कबुरतखाना वादावर थेट भाष्य केले आहे. एकप्रकारे त्यांनी कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माणसांपेक्षा कबूतर महत्वाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....