AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपन्या गुजरातला नेल्या, धारावीची जमीन बळकावण्याचा डाव; राहुल गांधींचा आरोप

महाविकासआघाडीची आज पहिली प्रचार सभा मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर होत आहे, या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. सर्व संस्थामध्ये संघाच्या लोकांना टाकण्याचा डाव सुरु असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

कंपन्या गुजरातला नेल्या, धारावीची जमीन बळकावण्याचा डाव; राहुल गांधींचा आरोप
| Updated on: Nov 06, 2024 | 8:02 PM
Share

मुंबईत आज महाविकासआघाडीची सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित आहेत. सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, ‘ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे आंबेडकरांचं संविधान, एकता, समानता, प्रेम, आदर आहे आणि दुसरीकडे द्वेष, समोरून नाही छुप्या पद्धतीने भाजपचे लोक संघाचे लोक या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरून सांगत नाहीत. समोरून सांगितलं तर परिणाम त्यांना माहीत आहे. त्यांच्या विरोधात संपूर्ण देश उभा राहील. त्यामुळे ते समोरून बोलत नाही. छुप्या पद्धतीने संविधान कमकुवत करत आहेत.’

संघाच्या लोकांना थेट संधी – राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या संस्था आहेत. नोकरशाही आहे. शिक्षण व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे. एका पार्टीला एका विचारधारेला हे लोक त्यांची लोक सर्व संस्थेत घुसवत आहेत. इंडिया आघाडीचे लोक हे करत नाही. विद्यापीठाचे कुलगुरुंची यादी पाहा. त्यात त्यांचं मेरिट दिसणार नाही. क्वालिफिकेशन फक्त संघाचा असावा. कुलगुरू बनायचं तर संघाचे सदस्य व्हा. शिक्षणाची गरज नाही. संघाचे असाल तर थेट तुम्हाला संधी मिळेल. फक्त विद्यापीठाबाबत हे होत नाही, देशातील सर्व संस्थांबाबत असं होत आहे.

निवडणूक आयोगावर दबाव

राहुल गांधी म्हणाले की, सरकार निवडणूक आयोगावर दबाव टाकत आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून सरकार पाडत आहे. मागची सरकार तुमची आणि आमचं सरकार होतं. इंडिया आघाडीचं सरकार होतं. चोरी करून, पैसे देऊन ते सरकार पाडलं.

दोन तीन उद्योगपतींना मदत करायची होती. तुम्हाला माहीत आहे, धारावीची जमीन एक लाख कोटी रुपयांची जमीन, गरीबांची जमीन तुमची जमीन तुमच्या डोळयासमोरून हिसकावली जात आहे. सर्व जागाला माहीत आहे. एका उद्योगपतीला ही जमीन दिली जात आहे. तुमचे प्रकल्प होते, बोईंगचं युनिट असो की अॅपलची फॅक्ट्री तुमच्याकडून काढून दुसऱ्या राज्यात नेत आहे. या प्रकल्पामुळे पाच लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या. त्या सर्व गुजरातला गेले.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.