AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपन्या गुजरातला नेल्या, धारावीची जमीन बळकावण्याचा डाव; राहुल गांधींचा आरोप

महाविकासआघाडीची आज पहिली प्रचार सभा मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर होत आहे, या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. सर्व संस्थामध्ये संघाच्या लोकांना टाकण्याचा डाव सुरु असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

कंपन्या गुजरातला नेल्या, धारावीची जमीन बळकावण्याचा डाव; राहुल गांधींचा आरोप
| Updated on: Nov 06, 2024 | 8:02 PM
Share

मुंबईत आज महाविकासआघाडीची सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित आहेत. सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, ‘ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे आंबेडकरांचं संविधान, एकता, समानता, प्रेम, आदर आहे आणि दुसरीकडे द्वेष, समोरून नाही छुप्या पद्धतीने भाजपचे लोक संघाचे लोक या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरून सांगत नाहीत. समोरून सांगितलं तर परिणाम त्यांना माहीत आहे. त्यांच्या विरोधात संपूर्ण देश उभा राहील. त्यामुळे ते समोरून बोलत नाही. छुप्या पद्धतीने संविधान कमकुवत करत आहेत.’

संघाच्या लोकांना थेट संधी – राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या संस्था आहेत. नोकरशाही आहे. शिक्षण व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे. एका पार्टीला एका विचारधारेला हे लोक त्यांची लोक सर्व संस्थेत घुसवत आहेत. इंडिया आघाडीचे लोक हे करत नाही. विद्यापीठाचे कुलगुरुंची यादी पाहा. त्यात त्यांचं मेरिट दिसणार नाही. क्वालिफिकेशन फक्त संघाचा असावा. कुलगुरू बनायचं तर संघाचे सदस्य व्हा. शिक्षणाची गरज नाही. संघाचे असाल तर थेट तुम्हाला संधी मिळेल. फक्त विद्यापीठाबाबत हे होत नाही, देशातील सर्व संस्थांबाबत असं होत आहे.

निवडणूक आयोगावर दबाव

राहुल गांधी म्हणाले की, सरकार निवडणूक आयोगावर दबाव टाकत आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून सरकार पाडत आहे. मागची सरकार तुमची आणि आमचं सरकार होतं. इंडिया आघाडीचं सरकार होतं. चोरी करून, पैसे देऊन ते सरकार पाडलं.

दोन तीन उद्योगपतींना मदत करायची होती. तुम्हाला माहीत आहे, धारावीची जमीन एक लाख कोटी रुपयांची जमीन, गरीबांची जमीन तुमची जमीन तुमच्या डोळयासमोरून हिसकावली जात आहे. सर्व जागाला माहीत आहे. एका उद्योगपतीला ही जमीन दिली जात आहे. तुमचे प्रकल्प होते, बोईंगचं युनिट असो की अॅपलची फॅक्ट्री तुमच्याकडून काढून दुसऱ्या राज्यात नेत आहे. या प्रकल्पामुळे पाच लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या. त्या सर्व गुजरातला गेले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.