आरेतील वृक्षतोड करणाऱ्यांना Pok मध्ये पाठवा : आदित्य ठाकरे

| Updated on: Oct 05, 2019 | 10:24 AM

आरेतील रात्रभरापासून तणावाचे वातावरण (Aarey tree cutting) पाहायला मिळाले. याप्रकरणी पर्यावरण प्रेमींसह राजकीय नेत्यांनीही (Political comment on Aarey tree cutting) संताप व्यक्त केला आहे.

आरेतील वृक्षतोड करणाऱ्यांना Pok मध्ये पाठवा : आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेत एका रात्रीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात (Aarey tree cutting) आली. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास आरे कॉलनीतील जवळपास 250 ते 300 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. पर्यावरणी प्रेमींना आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास विरोध (Aarey tree cutting) केला असता, अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्व गोष्टीमुळे आरेतील रात्रभरापासून तणावाचे वातावरण (Aarey tree cutting) पाहायला मिळाले. याप्रकरणी पर्यावरण प्रेमींसह राजकीय नेत्यांनीही (Political comment on Aarey tree cutting) संताप व्यक्त केला आहे.

आरेतील वृक्षतोडीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही विरोध दर्शवला आहे. “आरेतील जैवविविधता संपवण्याचा हा घाट लज्जास्पद आहे. अधिकारी ज्या तत्परतेने आरेतील झाडांची कत्तल करत आहेत, त्यांना पाकव्यापत काश्मीरमध्ये पाठवायला हवं. त्यांना पाकव्यापत काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्याचे काम सोपवायला हवं,” असा संताप आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray on Aarey tree cutting) व्यक्त केला आहे.

याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. यात न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्या पट्टीवर “आरे ही वन जमीन नाही” असे लिहीले आहे. संजय राऊत यांनी आरे वृक्ष तोडीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “तुम्ही सत्तेत आहात, आरेच्या मुद्द्यावरुन युती तोडा” असेही काहींनी यात म्हटलं आहे.

गेले तीन-चार महिने सगळीकडे आरे आरे करत आहेत. आरेतील झाडं कापण्यावरुन काहीजण आरेला उत्तर कारे म्हणून करत होते. पण आता सगळीकडे झोपारे कुणी बोलायलाच तयार नाही. कालपासून आरेतील झाडं कापण्यास सुरुवात झाली. आरे वाचवण्यासाठी कुणी झाडाला मिठ्या मारणार होते. कुणी एकही झाड तोडू देणार नव्हते. कुठे गेले कारे करणारे, आरेला कारे करणारे सर्व एक झालेत, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.