AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत ज्या मियावाकी झाडांची जोरदार चर्चा आहे ती लावायची कशी, जोपासायची कशी? आदित्य ठाकरेंकडून पहाणी

गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. एका वर्षात ही झाडं चांगली बहरली आहेत (Aditya Thackeray Japanese Miyawaki Garden)

मुंबईत ज्या मियावाकी झाडांची जोरदार चर्चा आहे ती लावायची कशी, जोपासायची कशी? आदित्य ठाकरेंकडून पहाणी
| Updated on: Feb 04, 2021 | 1:31 PM
Share

मुंबई : एकीकडे वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वृक्षतोडीवरुन राजकारण होत असताना मुंबईत 24 ठिकाणी मियावाकी वनं बहरली आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबुरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. (Aditya Thackeray visits Japanese Miyawaki Garden in Chembur Mumbai)

गेल्या वर्षभरात 24 ठिकाणी मियावाकी वनांच्या माध्यमातून तब्बल एक लाख 62 हजार 398 झाडे मुंबईला प्राणवायू देण्यास सज्ज झाली आहेत. मुंबईतील भक्ती पार्क येथील पालिकेच्या उद्यानात मियावाकी वन उभारलं आहे.

मियावाकी झाडं लावायची कशी, जोपासायची कशी?

त्सुनामीनंतर ओसाड होणाऱ्या जमिनीवर जपानी पद्धतीने झाडं जगवली गेली, तीच पद्धत मुंबईत वापरली गेली आहे. 93 वर्षीय शास्त्रज्ञ आकिरा मियावाकी यांच्या नावाने ही पद्धत ओळखली जाते.

मियावाकी पद्धतीत वनस्पतींच्या मूळ प्रजाती एकमेकांच्या अगदी जवळ लावल्या जातात, जेणेकरुन हरितकणांना फक्त वरुन सूर्यप्रकाश मिळतो आणि झाडांची आडव्या नव्हे, वरच्या दिशेने वाढ होते. परिणामी, वृक्ष अंदाजे 30 पट अधिक सघन होतात, 10 पट वेगाने वाढतात आणि 3 वर्षांच्या कालावधीनंतर देखभाल-मुक्त होतात.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. एका वर्षात ही झाडं चांगली बहरली आहेत. याची पाहणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबईत 3 लाख झाडांचं टार्गेट

“मुंबईत जी वेगवेगळी विकास कामं होत आहेत, मानखुर्दच्या फ्लायओव्हरचं काम काही दिवस थांबलं, पण 15 जूनच्या आधी काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आज भक्ती पार्कमध्ये 56 हजार झाडं झाली आहेत. पुढच्या दोन महिन्यात अजून 15 हजार झाडं लावणार आहोत” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ‘जिथे काँक्रिटचं जंगल आहे, तिथे झाडं लावणं गरजेचं आहे. मुंबईतलं आमचं टार्गेट 3 लाख झाडांचं आहे, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. (Aditya Thackeray visits Japanese Miyawaki Garden in Chembur Mumbai)

केंद्र सरकार चर्चा का करत नाही?

“कोणीही कितीही ट्वीट केलं, तरी केंद्र सरकार का बोलत नाही? आधी मला वाटलं की चायना बॉर्डर आहे, पण नंतर समजलं की ते तसं नाही, मग केंद्र सरकार का चर्चा करत नाही?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

मनसे म्हणजे टाईमपास

मनसे पक्ष आहे की काय आहे, हे माहित नाही. त्यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते पण नाहीत, टाईमपास आहे तो, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

इंधन दरवाढ आणि शेतकरी यावर आम्ही बोलत असतो. नौटंकी बंद करा, हे केंद्र सरकारला सांगावं आणि त्यांच्या मित्रांना सांगावं, केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांशी बोलावं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

(Aditya Thackeray visits Japanese Miyawaki Garden in Chembur Mumbai)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.